शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास घरोघरी तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:26 IST

Coronavirus News पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेला सूचनाही दिल्या आहेत.जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर कोरोनाचा आलेख खालावला. जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असताना, फेब्रुवारी महिन्यापासून शेजारच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. वाशिम जिल्ह्यातही १५ फेब्रुवारीपासून कोरोनाचा कहर सुरू झाला असून, दरदिवशी शंभरावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश असून, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येतील, तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. त्यानुसार आरोग्यवर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे आरोग्य कर्मचारी, आशा आदींच्या माध्यमातून पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील केली जाणार आहे. वेळीच उपचार मिळाल्यास कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करावे, कोणताही आजार लपवू नये, लक्षणे आढळून येताच कोरोना चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार ज्या गावांमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करावे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे.- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या