शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘आम आदमी’तर्फे शेतकरीविरोधी विधेयकाची होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 16:07 IST

शेतक-यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून, आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या विधेयकात दिली नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी केला.

उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन शेतकरीविरोधी विधेयके पारीत केल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाच्या पदाधिका-यांनी २४ सप्टेंबर रोजी वाशिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या विधेयकाची होळी केली.केंद्र सरकारने एकूण तीन विधेयके पारित केली आहेत. यामध्ये शेतक-यांच्या शेतीमालाला बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली. परंतु शेतक-याला मिळणा-या हमीभावाबाबत स्पष्ट उल्लेख केला नाही. यामुळे शेतक-यांच्या शेतीमालाचे दर खासगी कंपन्यांना ठरवता येणार असून, आधारभूत किमतीची कोणतीही शाश्वती या विधेयकात दिली नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी केला.आवश्यक वस्तू कायद्यात बदल करीत खासगी व्यापा-यांना काळाबाजार करण्याची वाट मोकळी करण्यात आली आहे. यामुळे मध्यमवर्गाला महागाईचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. तसेच 'मूल्य आश्वासन व कृषी सेवा शेतकरी (सशक्तीकरण आणि संवर्धन) करार' या कायद्याद्वारे शेतकरी व खासगी कंपन्यांना कराराच्या माध्यमातून शेती करता येणार आहे. कराराच्या अटींमध्ये शेतक-यांना फसवून खासगी कंपन्यांद्वारे त्यांची पिळवणूक करणारा हा कायदा आहे, असा आरोप यावेळी पदाधिका-यांनी केला.स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या विधेयकांची होळी करीत ‘शेती विरोधी कायदे करणा-या, शेतीमालाला हमीभाव नाकारणा-या केंद्र सरकारचा धिक्कार असो' अशी घोषणाबाजी पदाधिका-यांनी केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.