शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:56 IST

सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :शहरातून जाणाº्या दोन महामार्गाचे काम सुरु आहे. कामे करणाऱ्या दोन्ही स्वतंत्र कंत्राटदार एजन्सीने सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील रहदारीचे तीन तेरा वाजवले आहे. तसेच शहरातून जड वाहनांची सतत येºजा असल्याने, अपघातात वाढ होऊन प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. हे रस्ते बांधकाम नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे.महान-आर्णी व अमरावती-वाशिम असे दोन महामार्ग शहरातून जातात. या दोन्ही रस्त्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या महामार्गाच्या बांधकामामध्ये अवजड वाहनाचा उपयोग केल्या जात असल्याने पंचशील नगर ते शिंदे कॉलनी, बालदेव ते नदीपर्यंत या अवजड वाहनांची सतत ये-जा असते. या अवजड वाहनाचे चालक रहदारीचे सर्व नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ही वाहने चालवताना आढळत आहे. सर्वाधिक विद्यार्थी असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय मंगरूळपीर अकोला मार्गावर शहरात आहे. भरधाव वेगाने चालणाºया अवजड वाहनाने विद्यार्थी व महिलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. सर्वत्र गिट्टी दगड पडलेले असल्याने वाहनाच्या भरधाव वेगामुळे हे गिट्टी दगड उडून नागरिकांना लागून जखमी होण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या महामागार्चे बांधकाम होत असताना त्यातील सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.वातावरणात धूळ उडू नये म्हणून खोदकामावर सतत पाणी शिंपडत राहणे हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. कंत्राटदार एजन्सी नियमाचे पालन करीत नसल्याने शहरातील प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शासन व प्रशासन व्यवस्था यावर काहीही उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. शहर वाहतूक पोलीसाची आवश्यकता !शिवाजी चौक व डॉ. आंबेडकर चौकामध्ये प्रचंड प्रमाणात रहदारी निर्माण झाल्याने छोट्या अपघातात वाढ झालेली आहे. म्हणून पोलिस विभागाने दोन्ही चौकामध्ये स्वतंत्र चार ट्राफिक हवालदारांना सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तैनात करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर