शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:56 IST

सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :शहरातून जाणाº्या दोन महामार्गाचे काम सुरु आहे. कामे करणाऱ्या दोन्ही स्वतंत्र कंत्राटदार एजन्सीने सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील रहदारीचे तीन तेरा वाजवले आहे. तसेच शहरातून जड वाहनांची सतत येºजा असल्याने, अपघातात वाढ होऊन प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. हे रस्ते बांधकाम नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे.महान-आर्णी व अमरावती-वाशिम असे दोन महामार्ग शहरातून जातात. या दोन्ही रस्त्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या महामार्गाच्या बांधकामामध्ये अवजड वाहनाचा उपयोग केल्या जात असल्याने पंचशील नगर ते शिंदे कॉलनी, बालदेव ते नदीपर्यंत या अवजड वाहनांची सतत ये-जा असते. या अवजड वाहनाचे चालक रहदारीचे सर्व नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ही वाहने चालवताना आढळत आहे. सर्वाधिक विद्यार्थी असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय मंगरूळपीर अकोला मार्गावर शहरात आहे. भरधाव वेगाने चालणाºया अवजड वाहनाने विद्यार्थी व महिलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. सर्वत्र गिट्टी दगड पडलेले असल्याने वाहनाच्या भरधाव वेगामुळे हे गिट्टी दगड उडून नागरिकांना लागून जखमी होण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या महामागार्चे बांधकाम होत असताना त्यातील सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.वातावरणात धूळ उडू नये म्हणून खोदकामावर सतत पाणी शिंपडत राहणे हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. कंत्राटदार एजन्सी नियमाचे पालन करीत नसल्याने शहरातील प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शासन व प्रशासन व्यवस्था यावर काहीही उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. शहर वाहतूक पोलीसाची आवश्यकता !शिवाजी चौक व डॉ. आंबेडकर चौकामध्ये प्रचंड प्रमाणात रहदारी निर्माण झाल्याने छोट्या अपघातात वाढ झालेली आहे. म्हणून पोलिस विभागाने दोन्ही चौकामध्ये स्वतंत्र चार ट्राफिक हवालदारांना सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तैनात करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर