शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने ५५५ घरांची पडझड, १३९ गुरेही दगावली; मदत केव्हा ?

By दादाराव गायकवाड | Updated: September 13, 2022 16:14 IST

१.०५ कोटीच्या निधीची मागणी: जुन, जुलैमधील अतिवृष्टीची हानी

वाशिम: शासनाने जिल्ह्यात जुन ते जुलैदरम्यान अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानापोटी ५ हजार शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आहे. तथापि, याच कालावधित घरांची, गोठ्यांची पडझड, तसेच दगावलेल्या गुरांच्या नुकसानापोटी बाधित कुटूंबे, पशूपालकांना मदतीची प्रतिक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने बाधितांना मदत देण्यासाठी १ कोटी ५ लाख ४४ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात यंदा जुलैच्या सुरुवातीपासून पावसाचा कहर सुरु आहे. वारंवारच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीपिकांसह विविध प्रकारची हानी झाली. त्यात एका घराची पूर्णत: आणि ५५४ घरांची अंशत: पडझड झाली, तसेच १५ गोठेही पडले असून, पाण्यात वाहून, गोठा पडल्याने, वीज पडल्याने १३९ लहान, मोठी गुरेही दगावली. या नुकसानापाेटी जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्यांच्या आधारे अहवाल तयार करून तो विभागीयस्तरावर पाठवत निधीची मागणी केली आहे. २१ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सुधारीत अहवालही पाठवला, परंतु शासनाकडून बाधित कुटुंब, मृतांच्या वारसांना अद्याप मदत मिळाली नाही.कशासाठी किती हवी मदत

१) दगावलेली, जखमी गुरे - १३९आवश्यक मदतनिधी - २०,५२००पूर्णत: पडलेली घरे - ०१आवश्यक मदतनिधी - १,५०,०००अंशत: पडलेली घरे - ५५४आवश्यक मदतनिधी - ८३,१०,०००पडलेले गुरांचे गोठे - १५आवश्यक मदत - ३१,५००मृतकांच्या वारसांनाही प्रतिक्षा

जिल्ह्यात जुन ते ऑगस्टदरम्यान विविध वीज पडून २ जणांचा आणि इतर नैसर्गिक आपत्तीने ६ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जणांना दुखापत झाली. या नुकसानापोटी मृतकांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना प्रत्येकी १२,७०० रुपये प्रमाणे ३२,४६,९०० रुपये मदतनिधीची गरज असताना २९ लाखांचे वितरण करण्यात आले, तर ३ लाख ४६,९०० रुपये निधी प्रलंबित आहे.ऑगस्टमधील पीक नुकसानाची मदतही प्रलंबित

यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या पीक नुकसानापोटी शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी रक्कम मंजूर केली. त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ जुन, जुलैमधील नुकसानाची मदत मिळाली असून, ऑगस्टमधील नुकसानाची मदत प्रलंबित असल्याने ती मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानापोटी सुधारीत अहवाल पाठवून शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच बाधितांचा खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल. - शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :Rainपाऊसwashimवाशिमfloodपूर