शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

जिल्ह्यात पावसाचा धडाका; सरासरी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप ...

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने खरीप पिके संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, तुम्ही फोफावले असताना पावसाची रिपरिप सुरू असल्याने तण व्यवस्थापन व कीड नियंत्रणात खोळंबा निर्माण झाल्याने शेतकरी उघाडीची प्रतीक्षा करीत आहेत.

जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडू लागल्याने शेतकरी सुखावला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या आधारेच जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी वेग धरला होता. त्यानंतर पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने शेतीपिके संकटात होती. सुरुवातीला केलेल्या पेरणीतील पिके वीतभर वाढली; परंतु जूनच्या मध्यानंतर दडी मारल्यानंतर जुलै महिना उजाडला तरी पावसाची सर नसल्याने शेतकरी पावसाकडे नजर लावून होता. ग्रामीण भागात पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्यात आली होती. त्यात तूर, कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांची चांगली उगवण झाली होती; पण पावसाने दडी मारल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली होती; पण गत आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना आधार मिळाला; परंतु आठवडाभरापासून पावसाने ठाण मांडल्याने आता पिके संकटात सापडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारीही अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरूच होती.

---------------------------

२४ तासांत ६३ मि.मी. पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात वाशिम ४९.४, रिसोड ४५.१, मालेगाव ५७.२, मंगरूळपीर ११४.६, , मानोरा ६५.८, कारंजा ५९.२, असे पावसाचे प्रमाण आहे. दरम्यान, गत पाच दिवसांतच जिल्ह्यात सरासरी १०० मि‌.मी.पेक्षा अधिक ‌पावसाची नोंद झाली आहे.

---------------------------------

काही भागांत दिलासा

गत आठवडाभरापासून पावसाने रिपरिप लावल्याने बहुतांश भागातील पिके संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी काही भागांत मात्र या पावसामुळे दिलासाही मिळाला आहे. प्रामुख्याने कारंजी आणि मानोरा तालुक्यांतील पावसाचे प्रमाण कमी असताना गत दोन दिवसांत आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

-------------------------------------

तूर, सोयाबीनवर परिणाम

गत तीन दिवसांत अनेक भागांत सतत पाऊस पडल्याने शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली आहे. याचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. प्रामुख्याने काही भागांत तूर आणि सोयाबीन पीक पिवळे पडते असल्याचे निरीक्षण कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. तथापि, पावसाने उसंत घेतल्यास ही पिके सावरणार आहेत.

-----------------------------

कोट : गत दोन दिवसांतच पावसाचे प्रमाण अधिक झाले. सद्य:स्थितीत पिके चांगली आहेत; परंतु पावसाचे प्रमाण पुढे चार पाच दिवस असेच राहिले, तर पिके पिवळी पडण्यास सुरुवात होईल. ज्या जमिनीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. त्या जमिनीतील पिकांना मात्र धोका नाही.

- डॉ. रवींद्र काळे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, तथा प्रमुख

क‌षी विज्ञान केंद्र वाशिम

_-----------------------

कोट: सुरुवातीला पावसाने खंड दिल्यामुळे पिके संकटात सापडली होती, तर आता गत तीन, चार दिवसांपासून पावसाने धडाकाच लावला आहे. त्यामुळे पिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय सत्तरच्या पावसाने तण व्यवस्थापनात खोळंबा निर्माण केला आहे.

- - दिगंबर पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

---------------------------------