शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

जिल्ह्यात पावसाचा धडाका; सरासरी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप ...

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने खरीप पिके संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, तुम्ही फोफावले असताना पावसाची रिपरिप सुरू असल्याने तण व्यवस्थापन व कीड नियंत्रणात खोळंबा निर्माण झाल्याने शेतकरी उघाडीची प्रतीक्षा करीत आहेत.

जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडू लागल्याने शेतकरी सुखावला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या आधारेच जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी वेग धरला होता. त्यानंतर पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने शेतीपिके संकटात होती. सुरुवातीला केलेल्या पेरणीतील पिके वीतभर वाढली; परंतु जूनच्या मध्यानंतर दडी मारल्यानंतर जुलै महिना उजाडला तरी पावसाची सर नसल्याने शेतकरी पावसाकडे नजर लावून होता. ग्रामीण भागात पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्यात आली होती. त्यात तूर, कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांची चांगली उगवण झाली होती; पण पावसाने दडी मारल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली होती; पण गत आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना आधार मिळाला; परंतु आठवडाभरापासून पावसाने ठाण मांडल्याने आता पिके संकटात सापडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारीही अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरूच होती.

---------------------------

२४ तासांत ६३ मि.मी. पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात वाशिम ४९.४, रिसोड ४५.१, मालेगाव ५७.२, मंगरूळपीर ११४.६, , मानोरा ६५.८, कारंजा ५९.२, असे पावसाचे प्रमाण आहे. दरम्यान, गत पाच दिवसांतच जिल्ह्यात सरासरी १०० मि‌.मी.पेक्षा अधिक ‌पावसाची नोंद झाली आहे.

---------------------------------

काही भागांत दिलासा

गत आठवडाभरापासून पावसाने रिपरिप लावल्याने बहुतांश भागातील पिके संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी काही भागांत मात्र या पावसामुळे दिलासाही मिळाला आहे. प्रामुख्याने कारंजी आणि मानोरा तालुक्यांतील पावसाचे प्रमाण कमी असताना गत दोन दिवसांत आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

-------------------------------------

तूर, सोयाबीनवर परिणाम

गत तीन दिवसांत अनेक भागांत सतत पाऊस पडल्याने शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली आहे. याचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. प्रामुख्याने काही भागांत तूर आणि सोयाबीन पीक पिवळे पडते असल्याचे निरीक्षण कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. तथापि, पावसाने उसंत घेतल्यास ही पिके सावरणार आहेत.

-----------------------------

कोट : गत दोन दिवसांतच पावसाचे प्रमाण अधिक झाले. सद्य:स्थितीत पिके चांगली आहेत; परंतु पावसाचे प्रमाण पुढे चार पाच दिवस असेच राहिले, तर पिके पिवळी पडण्यास सुरुवात होईल. ज्या जमिनीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. त्या जमिनीतील पिकांना मात्र धोका नाही.

- डॉ. रवींद्र काळे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, तथा प्रमुख

क‌षी विज्ञान केंद्र वाशिम

_-----------------------

कोट: सुरुवातीला पावसाने खंड दिल्यामुळे पिके संकटात सापडली होती, तर आता गत तीन, चार दिवसांपासून पावसाने धडाकाच लावला आहे. त्यामुळे पिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय सत्तरच्या पावसाने तण व्यवस्थापनात खोळंबा निर्माण केला आहे.

- - दिगंबर पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

---------------------------------