शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा धडाका; सरासरी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप ...

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने खरीप पिके संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, तुम्ही फोफावले असताना पावसाची रिपरिप सुरू असल्याने तण व्यवस्थापन व कीड नियंत्रणात खोळंबा निर्माण झाल्याने शेतकरी उघाडीची प्रतीक्षा करीत आहेत.

जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडू लागल्याने शेतकरी सुखावला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या आधारेच जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी वेग धरला होता. त्यानंतर पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने शेतीपिके संकटात होती. सुरुवातीला केलेल्या पेरणीतील पिके वीतभर वाढली; परंतु जूनच्या मध्यानंतर दडी मारल्यानंतर जुलै महिना उजाडला तरी पावसाची सर नसल्याने शेतकरी पावसाकडे नजर लावून होता. ग्रामीण भागात पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्यात आली होती. त्यात तूर, कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांची चांगली उगवण झाली होती; पण पावसाने दडी मारल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली होती; पण गत आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना आधार मिळाला; परंतु आठवडाभरापासून पावसाने ठाण मांडल्याने आता पिके संकटात सापडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारीही अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरूच होती.

---------------------------

२४ तासांत ६३ मि.मी. पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात वाशिम ४९.४, रिसोड ४५.१, मालेगाव ५७.२, मंगरूळपीर ११४.६, , मानोरा ६५.८, कारंजा ५९.२, असे पावसाचे प्रमाण आहे. दरम्यान, गत पाच दिवसांतच जिल्ह्यात सरासरी १०० मि‌.मी.पेक्षा अधिक ‌पावसाची नोंद झाली आहे.

---------------------------------

काही भागांत दिलासा

गत आठवडाभरापासून पावसाने रिपरिप लावल्याने बहुतांश भागातील पिके संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी काही भागांत मात्र या पावसामुळे दिलासाही मिळाला आहे. प्रामुख्याने कारंजी आणि मानोरा तालुक्यांतील पावसाचे प्रमाण कमी असताना गत दोन दिवसांत आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

-------------------------------------

तूर, सोयाबीनवर परिणाम

गत तीन दिवसांत अनेक भागांत सतत पाऊस पडल्याने शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली आहे. याचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. प्रामुख्याने काही भागांत तूर आणि सोयाबीन पीक पिवळे पडते असल्याचे निरीक्षण कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. तथापि, पावसाने उसंत घेतल्यास ही पिके सावरणार आहेत.

-----------------------------

कोट : गत दोन दिवसांतच पावसाचे प्रमाण अधिक झाले. सद्य:स्थितीत पिके चांगली आहेत; परंतु पावसाचे प्रमाण पुढे चार पाच दिवस असेच राहिले, तर पिके पिवळी पडण्यास सुरुवात होईल. ज्या जमिनीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. त्या जमिनीतील पिकांना मात्र धोका नाही.

- डॉ. रवींद्र काळे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, तथा प्रमुख

क‌षी विज्ञान केंद्र वाशिम

_-----------------------

कोट: सुरुवातीला पावसाने खंड दिल्यामुळे पिके संकटात सापडली होती, तर आता गत तीन, चार दिवसांपासून पावसाने धडाकाच लावला आहे. त्यामुळे पिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय सत्तरच्या पावसाने तण व्यवस्थापनात खोळंबा निर्माण केला आहे.

- - दिगंबर पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

---------------------------------