शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
4
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
5
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
6
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
7
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
8
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
9
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
10
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
11
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
12
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
13
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
14
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
15
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
16
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
17
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
19
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
20
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने मोडले ऊस उत्पादकांचे कंबरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

जिल्ह्यात सोमवार ६ सप्टेंबर ते मंगळवार ७ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४७.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ५५.१० ...

जिल्ह्यात सोमवार ६ सप्टेंबर ते मंगळवार ७ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४७.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ५५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून त्यांची शेतजमीन पिकांसह खरडून गेली. त्यात तपोवन येथील परिपक्वतेच्या अवस्थेत असलेले उसाचे पीकही जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तथापि, या नुकसानीची पाहणी व पंचनामे स्थानिक प्रशासनाने केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन पाठवून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. पंकज लक्ष्मणराव येवले, रवींद्र कोंडुजी सावध, मुरलीधर महादेव येवले, शरद भानुदास येवले, स्वप्नील दिलीप येवले, गणेश सोपानराव येवले, गजानन लक्ष्मण येवले या सात शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

००००००००००००००००००

उत्पादनाची आशाच नाही

सोमवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे उसाच्या पिकाला तडाखा बसून, संपूर्ण पीक मोडून जमिनीवर पडले. आता हे पीक उभे होण्याची कुठलीच शाश्वती नसल्याने या पिकापासून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना राहिली नाही.

००००००००००००००००००

पाच दिवस उलटूनही दखल नाही

तपोवन येथे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. यात ऊस पिकाचाही समावेश आहे. तथापि, पाच दिवस उलटून गेले तरी या पिकाचे पंचनामे करण्याची तसदी महसूल किंवा कृषी विभागाने घेतली नाही.

००००००००००००००००००

कोट : सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे आमच्या शेतातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण पीक मोडून पडले आहे. त्यामुळे यातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नसल्याने प्रशासनाकडून पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.

-शरद येवले,

ऊस उत्पादक शेतकरी,

००००००००००००००००००

कोट : मुसळधार पावसामुळे दीड एकर क्षेत्रातील उसाचे पीक पूर्णपणे कोलमडून पडले. आता या पिकातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नाही. त्यामुळे या पिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यातच गेला असून, आर्थिक संकट आमच्या कोसळले. तेव्हा आम्हाला आर्थिक मदत मिळावी.

--रवींद्र सावध,

ऊस उत्पादक शेतकरी