शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

मुसळधार पावसाने मोडले ऊस उत्पादकांचे कंबरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

जिल्ह्यात सोमवार ६ सप्टेंबर ते मंगळवार ७ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४७.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ५५.१० ...

जिल्ह्यात सोमवार ६ सप्टेंबर ते मंगळवार ७ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४७.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ५५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून त्यांची शेतजमीन पिकांसह खरडून गेली. त्यात तपोवन येथील परिपक्वतेच्या अवस्थेत असलेले उसाचे पीकही जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तथापि, या नुकसानीची पाहणी व पंचनामे स्थानिक प्रशासनाने केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन पाठवून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. पंकज लक्ष्मणराव येवले, रवींद्र कोंडुजी सावध, मुरलीधर महादेव येवले, शरद भानुदास येवले, स्वप्नील दिलीप येवले, गणेश सोपानराव येवले, गजानन लक्ष्मण येवले या सात शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

००००००००००००००००००

उत्पादनाची आशाच नाही

सोमवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे उसाच्या पिकाला तडाखा बसून, संपूर्ण पीक मोडून जमिनीवर पडले. आता हे पीक उभे होण्याची कुठलीच शाश्वती नसल्याने या पिकापासून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना राहिली नाही.

००००००००००००००००००

पाच दिवस उलटूनही दखल नाही

तपोवन येथे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. यात ऊस पिकाचाही समावेश आहे. तथापि, पाच दिवस उलटून गेले तरी या पिकाचे पंचनामे करण्याची तसदी महसूल किंवा कृषी विभागाने घेतली नाही.

००००००००००००००००००

कोट : सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे आमच्या शेतातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण पीक मोडून पडले आहे. त्यामुळे यातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नसल्याने प्रशासनाकडून पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.

-शरद येवले,

ऊस उत्पादक शेतकरी,

००००००००००००००००००

कोट : मुसळधार पावसामुळे दीड एकर क्षेत्रातील उसाचे पीक पूर्णपणे कोलमडून पडले. आता या पिकातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नाही. त्यामुळे या पिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यातच गेला असून, आर्थिक संकट आमच्या कोसळले. तेव्हा आम्हाला आर्थिक मदत मिळावी.

--रवींद्र सावध,

ऊस उत्पादक शेतकरी