शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

नवजातांच्या श्रवण चाचणीअभावी कर्णबधिरत्व वैगुण्यात वाढ

By admin | Updated: September 28, 2015 02:16 IST

कर्णबधिरतेचा आजार फोफावत असून, यास शासन व पालकांची उदासीनता कारणीभूत.

वाशिम : अपत्याचा जन्म होताच चाचण्या न केल्याने कर्णबधिरतेचा आजार फोफावत असून, याला शासन व पालकांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप कर्णबधिरांच्या उत्थानासाठी झटणार्‍या स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. कर्णबधिरत्व हे अदृश्य व दुहेरी अपंगत्व आहे. देशात २.१ टक्के लोक या आजाराने ग्रासले आहेत. हा आजार चार प्रकारचा असतो. यामध्ये सौम्य, मध्यम, तीव्र व अतितीव्र कर्णबधिरत्व हे चार प्रकार आहेत. जन्मताच अपत्य कर्णबधिर आहे का, याची चाचणी झाली, तर त्वरित उपाय करता येतात व त्यामुळे बहुतांश मुलांमधून हा दोष नाहीसा होऊ शकतो; मात्र अशाप्रकारची तपासणी केली जात नाही. मूल दोन ते तीन वर्षांचे झाल्यावर पालकांना ते कर्णबधिर असल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचारही करण्यात येत नाहीत. याबाबत माहिती देताना अकोला येथील एकवीरा फाउंडेशनचे श्रीकांत बनसोड यांनी सांगितले, की जन्माला आलेले अपत्य कर्णबधिर असल्याचे तीन महिन्यांच्या आत समजले, तर त्यावर उपचार होऊ शकतात; मात्र मुलं मोठी झाल्यावर उपचार करणे कठीण होते. जिल्ह्यात उपचार केंद्र नाहीत वाशिम जिल्ह्यात कर्णबधिर मुलांवर उपचार करणारे केंद्रच नाहीत तसेच कर्णबधिरांना शिक्षण देणार्‍या शाळाही नाहीत. त्यामुळे अशा मुलांवर उपचार करण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथे पाठवावे लागते तसेच या मुलांना शिक्षण देण्यासाठीही मोठय़ा शहरांमध्येच पाठवावे लागते. अनसिंग येथे कर्णबधिरांची एक शाळा असून, तेथे केवळ आठवीपर्यंंत शिक्षण दिले जाते.