शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बरे तर झालो; पण चिंतारोग, निद्रानाशाला बळी पडलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

वाशिम : कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु भविष्यात कोरोना संसर्ग झाला तर, नोकरी गेली तर, रोजगार मिळेल का? किंवा उद्योग-धंद्याचे ...

वाशिम : कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु भविष्यात कोरोना संसर्ग झाला तर, नोकरी गेली तर, रोजगार मिळेल का? किंवा उद्योग-धंद्याचे बारा वाजले तर...? अशा एक ना अनेक नकारात्मक विचारांमुळे अनेकांना चिंतारोग, निद्रानाशाला बळी पडावे लागत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांच्या तपासणीतून समोर येत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर चिंतारोग, निद्रानाश या समस्येने ग्रासलेल्या रुग्णांच्या ओपीडीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

भावनिक व शारीरिक स्वरूपाचा एक अनुभव तसेच सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल होणाऱ्या मनातील द्वंद्वाचा बाह्य आविष्कार म्हणून चिंतारोगाकडे पाहिले जाते. जीवनातील अनेक लहान-मोठ्य़ा प्रसंगांना सामोरे जाताना एखाद्या वेळी खूप भावुक वाटायला लागते. मनात खूप चिंता दाटून येते. काहीतरी वाईट होणार आहे वा काहीतरी हातातून निसटून जाणार आहे, असे वाटून जेव्हा जीव गुदमरायला लागतो आणि झोपही उडते; तेव्हा चिंतारोग, निद्रानाशाची समस्या निर्माण झाली, असे समजले जाते. कोरोनामुळे अनेकांच्या मनात असे नकारात्मक विचारांचे बीजारोपण झाल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आपले, कुटुंबाचे काय होईल? नोकरी, रोजगार तर हिरावला जाणार नाही, असुरक्षिततेची भावना, उद्योग-धंदा तर ठप्प पडणार नाही. आर्थिक परिस्थिती ढासळणार तर नाही ना? अशा एक ना अनेक नकारात्मक विचारांमुळे कोरोनातून बरे झालेल्या अनेकांमध्ये चिंतारोग, निद्रानाशाची समस्या आढळून येत आहे. अशा परिस्थिती कुटुंबीयांनी संबंधित रुग्णाला धीर देणे, त्याच्यामध्ये सकारात्मक विचारांची पेरण करणे आवश्यक आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

..................

चिंतारोग कमी कसा करावा?

कुटुंबीयांनी संबंधित रुग्णाच्या मनातील असुरक्षिततेची भावना काढून टाकण्याचा प्रयत्न करावा, धीर द्यावा, कोरोना झाला म्हणजे प्रत्येकजण गंभीरच होतो असे नाही हे पटवून द्यावे, कोणतीही परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते; ती बदलत असते आणि आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो, असा सकारात्मक विचार संबंधित रुग्णामध्ये रुजवावा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला.

.............

आजची परिस्थिती उद्या बदलणारच..!

कोट

निद्रानाश, चिंतारोग या समस्या घेऊन येणाऱ्यांची ओपीडी पाच ते दहा टक्क्यांपर्यंत गेली आहे. अशा रुग्णाला धीर देत आजची वाईट परिस्थिती उद्या नसणार, परिस्थिती बदलणार आहे, हे पटवून द्यायला हवे.

- डॉ. नरेश इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ वाशिम.

.....

काही जणांना असुरक्षिततेची भावना, नकारात्मक विचार व अन्य कारणांमुळे चिंतारोग, निद्रानाश जडत असल्याचे दिसून येते. सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आदी आवश्यक आहे.

- डॉ. मंगेश राठोड,

मानसोपचार तज्ज्ञ वाशिम

....................

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना चिंतारोगाने ग्रासले असल्याचे तपासणीतून समोर येत आहे. कुटुुंबीयांचे मानसिक पाठबळ आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला, उपचार यामुळे या आजारावर मात करता येऊ शकते.

- डॉ. रवींद्र अवचार,

मानसोपचार तज्ज्ञ वाशिम