शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कोरोनातून बरे तर झालो; पण चिंतारोग, निद्रानाशाला बळी पडलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

वाशिम : कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु भविष्यात कोरोना संसर्ग झाला तर, नोकरी गेली तर, रोजगार मिळेल का? किंवा उद्योग-धंद्याचे ...

वाशिम : कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु भविष्यात कोरोना संसर्ग झाला तर, नोकरी गेली तर, रोजगार मिळेल का? किंवा उद्योग-धंद्याचे बारा वाजले तर...? अशा एक ना अनेक नकारात्मक विचारांमुळे अनेकांना चिंतारोग, निद्रानाशाला बळी पडावे लागत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांच्या तपासणीतून समोर येत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर चिंतारोग, निद्रानाश या समस्येने ग्रासलेल्या रुग्णांच्या ओपीडीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

भावनिक व शारीरिक स्वरूपाचा एक अनुभव तसेच सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल होणाऱ्या मनातील द्वंद्वाचा बाह्य आविष्कार म्हणून चिंतारोगाकडे पाहिले जाते. जीवनातील अनेक लहान-मोठ्य़ा प्रसंगांना सामोरे जाताना एखाद्या वेळी खूप भावुक वाटायला लागते. मनात खूप चिंता दाटून येते. काहीतरी वाईट होणार आहे वा काहीतरी हातातून निसटून जाणार आहे, असे वाटून जेव्हा जीव गुदमरायला लागतो आणि झोपही उडते; तेव्हा चिंतारोग, निद्रानाशाची समस्या निर्माण झाली, असे समजले जाते. कोरोनामुळे अनेकांच्या मनात असे नकारात्मक विचारांचे बीजारोपण झाल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आपले, कुटुंबाचे काय होईल? नोकरी, रोजगार तर हिरावला जाणार नाही, असुरक्षिततेची भावना, उद्योग-धंदा तर ठप्प पडणार नाही. आर्थिक परिस्थिती ढासळणार तर नाही ना? अशा एक ना अनेक नकारात्मक विचारांमुळे कोरोनातून बरे झालेल्या अनेकांमध्ये चिंतारोग, निद्रानाशाची समस्या आढळून येत आहे. अशा परिस्थिती कुटुंबीयांनी संबंधित रुग्णाला धीर देणे, त्याच्यामध्ये सकारात्मक विचारांची पेरण करणे आवश्यक आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

..................

चिंतारोग कमी कसा करावा?

कुटुंबीयांनी संबंधित रुग्णाच्या मनातील असुरक्षिततेची भावना काढून टाकण्याचा प्रयत्न करावा, धीर द्यावा, कोरोना झाला म्हणजे प्रत्येकजण गंभीरच होतो असे नाही हे पटवून द्यावे, कोणतीही परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते; ती बदलत असते आणि आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो, असा सकारात्मक विचार संबंधित रुग्णामध्ये रुजवावा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला.

.............

आजची परिस्थिती उद्या बदलणारच..!

कोट

निद्रानाश, चिंतारोग या समस्या घेऊन येणाऱ्यांची ओपीडी पाच ते दहा टक्क्यांपर्यंत गेली आहे. अशा रुग्णाला धीर देत आजची वाईट परिस्थिती उद्या नसणार, परिस्थिती बदलणार आहे, हे पटवून द्यायला हवे.

- डॉ. नरेश इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ वाशिम.

.....

काही जणांना असुरक्षिततेची भावना, नकारात्मक विचार व अन्य कारणांमुळे चिंतारोग, निद्रानाश जडत असल्याचे दिसून येते. सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आदी आवश्यक आहे.

- डॉ. मंगेश राठोड,

मानसोपचार तज्ज्ञ वाशिम

....................

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना चिंतारोगाने ग्रासले असल्याचे तपासणीतून समोर येत आहे. कुटुुंबीयांचे मानसिक पाठबळ आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला, उपचार यामुळे या आजारावर मात करता येऊ शकते.

- डॉ. रवींद्र अवचार,

मानसोपचार तज्ज्ञ वाशिम