शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देवगडच्या हापूस आंब्याची वाशिममध्ये विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:55 IST

देवगडच्या हापूस आंब्याच्या ५०० पेट्यांची मंगळवार, २८ एप्रिल रोजी वाशिममध्ये विक्री करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याच्या ५०० पेट्यांची मंगळवार, २८ एप्रिल रोजी वाशिममध्ये विक्री करण्यात आली. त्यावरून ही बाब पुन्हा अधोरेखीत झाली आहे.‘लॉकडाऊन’ काळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला आणि फळांच्या विक्री प्रक्रियेत कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी पुढाकार घेऊन शेतकरी ते ग्राहक शेतमालाची थेट विक्री हा उपक्रम राबविला. यामाध्यमातून २३ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील २२९ गावांमधील १७२१ शेतकºयांना थेट ग्राहकांशी जोडण्यात आले. त्यातून तब्बल ३ कोटी ३६ लाख ५५ हजार रुपयांची उलाढाल झाली.याच उपक्रमांतर्गत प्रकल्प संचालक ‘आत्मा’, जि. रत्नागिरी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, ‘आत्मा’ वाशिम यांच्याकडे २८ एप्रिल रोजी राजापूर (जि. रत्नागिरी) येथून ५०० हापूस आंब्याच्या पेट्या पाठविण्यात आल्या. प्रत्येक पेटीमध्ये दोन डझन आंबे होते. त्याची वाशिम शहरातील तिरूपती सिटीमध्ये वास्तव्यास असलेले नगर परिषदेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांना एक हजार रुपये पेटीप्रमाणे विक्री करण्यात आली. हापूस आंब्याचे आकर्षण असणाºयांनी अवघ्या अर्ध्या तासातच सर्व आंबा खरेदी करून घेतला. यामाध्यमातून संबंधित आंबा उत्पादकास ५ लाखांची मिळकत झाली. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, तंत्र अधिकारी समाधान पडघन, कृषी सहाय्यक अनिल जयताडे, कृषी सहाय्यक खिल्लारे, पंजाब जाधव, जयप्रकाश लव्हाळे यांनी प्रयत्न केले.

‘लॉकडाऊन’च्या काळात शेतकºयांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी ते ग्राहक शेतमालाची थेट विक्री या उपक्रमामुळे हा उद्देश बहुतांशी साध्य झाला आहे.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम