शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादनाचा आलेख खालावला!

By admin | Updated: January 31, 2017 02:50 IST

चार वर्षांंत १५00 वरून १३३ हेक्टरपर्यंंत घसरण; आवळा, कागदी लिंबू, पेरू, फणस हद्दपार.

सुनील काकडे वाशिम, दि. ३0- कधीकाळी डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा यांसह इतर फळबागांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साध्य होऊ लागली होती; मात्र नैसर्गिक आपत्ती तथा तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव, या कारणांमुळे जिल्हय़ात गत चार वर्षात फलोत्पादनाचा आलेख सुमारे ८५ टक्क्याने खालावला आहे. २0१२-१३ मध्ये फळबागांचे असलेले १५0७.९७ हेक्टर क्षेत्र सध्या केवळ १३३.५८ हेक्टरवर स्थिरावले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणत: ४.५ लाख आणि रब्बी हंगामात १ लाख हेक्टरच्या आसपास पारंपरिक पिकांची पेरणी केली जाते; परंतु तीच ती पिके वारंवार घेतली जात असल्याने शेतीचा कस बिघडत चालला असून, शेतमालाच्या उत्पादनात वर्षागणिक घट होत आहे. ही बाब लक्षात घेता फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर प्रशासनाने विशेष भर द्यायला हवा. माती परीक्षणांती आणि हवामानाधारित कुठल्या जमिनीत कुठल्या फळबागा तग धरू शकतात, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकर्‍यांना मिळायला हवे; मात्र कृषी विभागाकडून तसे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने लागवड केलेल्या फळबागादेखील आजमितीस नामशेष झाल्या आहेत.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सन २0१२-१३ मध्ये संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा, मोसंबी, आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ, फणस अशा सर्वच फळांची यशस्विरीत्या लागवड करण्यात आली होती. त्याचे एकंदरीत क्षेत्र तब्बल १५0७.९७ हेक्टरवर पोहोचले होते. यात संत्रा, आंबा आणि फणसची विक्रमी लागवड झाली होती; मात्र दुसर्‍याच वर्षी अर्थात २0१३-१४ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात घट होत १६६.६५ हेक्टरची प्रत्यक्ष लागवड झाली. या वर्षांंंत मोसंबी, पेरू, जांभूळ आणि फणस या फळांची लागवड शून्य होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३८५.९५, २0१५-१६ मध्ये १४५.१0 आणि २0१६-१७ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात विक्रमी घट होत केवळ १३३.५८ हेक्टर क्षेत्रावर संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा आणि मोसंबीचा काहीअंशी समावेश असून आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ आणि फणसाची लागवड शून्य आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात ४१९.२४ हेक्टरवर लागवड झालेल्या संत्र्याचे क्षेत्र सध्या केवळ ३८.१0 हेक्टरवर आल्याचे दिसून येत आहे.