शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

फलोत्पादनाचा आलेख खालावला!

By admin | Updated: January 31, 2017 02:50 IST

चार वर्षांंत १५00 वरून १३३ हेक्टरपर्यंंत घसरण; आवळा, कागदी लिंबू, पेरू, फणस हद्दपार.

सुनील काकडे वाशिम, दि. ३0- कधीकाळी डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा यांसह इतर फळबागांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साध्य होऊ लागली होती; मात्र नैसर्गिक आपत्ती तथा तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव, या कारणांमुळे जिल्हय़ात गत चार वर्षात फलोत्पादनाचा आलेख सुमारे ८५ टक्क्याने खालावला आहे. २0१२-१३ मध्ये फळबागांचे असलेले १५0७.९७ हेक्टर क्षेत्र सध्या केवळ १३३.५८ हेक्टरवर स्थिरावले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणत: ४.५ लाख आणि रब्बी हंगामात १ लाख हेक्टरच्या आसपास पारंपरिक पिकांची पेरणी केली जाते; परंतु तीच ती पिके वारंवार घेतली जात असल्याने शेतीचा कस बिघडत चालला असून, शेतमालाच्या उत्पादनात वर्षागणिक घट होत आहे. ही बाब लक्षात घेता फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर प्रशासनाने विशेष भर द्यायला हवा. माती परीक्षणांती आणि हवामानाधारित कुठल्या जमिनीत कुठल्या फळबागा तग धरू शकतात, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकर्‍यांना मिळायला हवे; मात्र कृषी विभागाकडून तसे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने लागवड केलेल्या फळबागादेखील आजमितीस नामशेष झाल्या आहेत.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सन २0१२-१३ मध्ये संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा, मोसंबी, आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ, फणस अशा सर्वच फळांची यशस्विरीत्या लागवड करण्यात आली होती. त्याचे एकंदरीत क्षेत्र तब्बल १५0७.९७ हेक्टरवर पोहोचले होते. यात संत्रा, आंबा आणि फणसची विक्रमी लागवड झाली होती; मात्र दुसर्‍याच वर्षी अर्थात २0१३-१४ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात घट होत १६६.६५ हेक्टरची प्रत्यक्ष लागवड झाली. या वर्षांंंत मोसंबी, पेरू, जांभूळ आणि फणस या फळांची लागवड शून्य होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३८५.९५, २0१५-१६ मध्ये १४५.१0 आणि २0१६-१७ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात विक्रमी घट होत केवळ १३३.५८ हेक्टर क्षेत्रावर संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा आणि मोसंबीचा काहीअंशी समावेश असून आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ आणि फणसाची लागवड शून्य आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात ४१९.२४ हेक्टरवर लागवड झालेल्या संत्र्याचे क्षेत्र सध्या केवळ ३८.१0 हेक्टरवर आल्याचे दिसून येत आहे.