शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

फलोत्पादनाचा आलेख खालावला!

By admin | Updated: January 31, 2017 02:50 IST

चार वर्षांंत १५00 वरून १३३ हेक्टरपर्यंंत घसरण; आवळा, कागदी लिंबू, पेरू, फणस हद्दपार.

सुनील काकडे वाशिम, दि. ३0- कधीकाळी डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा यांसह इतर फळबागांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साध्य होऊ लागली होती; मात्र नैसर्गिक आपत्ती तथा तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव, या कारणांमुळे जिल्हय़ात गत चार वर्षात फलोत्पादनाचा आलेख सुमारे ८५ टक्क्याने खालावला आहे. २0१२-१३ मध्ये फळबागांचे असलेले १५0७.९७ हेक्टर क्षेत्र सध्या केवळ १३३.५८ हेक्टरवर स्थिरावले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणत: ४.५ लाख आणि रब्बी हंगामात १ लाख हेक्टरच्या आसपास पारंपरिक पिकांची पेरणी केली जाते; परंतु तीच ती पिके वारंवार घेतली जात असल्याने शेतीचा कस बिघडत चालला असून, शेतमालाच्या उत्पादनात वर्षागणिक घट होत आहे. ही बाब लक्षात घेता फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर प्रशासनाने विशेष भर द्यायला हवा. माती परीक्षणांती आणि हवामानाधारित कुठल्या जमिनीत कुठल्या फळबागा तग धरू शकतात, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकर्‍यांना मिळायला हवे; मात्र कृषी विभागाकडून तसे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने लागवड केलेल्या फळबागादेखील आजमितीस नामशेष झाल्या आहेत.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सन २0१२-१३ मध्ये संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा, मोसंबी, आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ, फणस अशा सर्वच फळांची यशस्विरीत्या लागवड करण्यात आली होती. त्याचे एकंदरीत क्षेत्र तब्बल १५0७.९७ हेक्टरवर पोहोचले होते. यात संत्रा, आंबा आणि फणसची विक्रमी लागवड झाली होती; मात्र दुसर्‍याच वर्षी अर्थात २0१३-१४ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात घट होत १६६.६५ हेक्टरची प्रत्यक्ष लागवड झाली. या वर्षांंंत मोसंबी, पेरू, जांभूळ आणि फणस या फळांची लागवड शून्य होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३८५.९५, २0१५-१६ मध्ये १४५.१0 आणि २0१६-१७ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात विक्रमी घट होत केवळ १३३.५८ हेक्टर क्षेत्रावर संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा आणि मोसंबीचा काहीअंशी समावेश असून आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ आणि फणसाची लागवड शून्य आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात ४१९.२४ हेक्टरवर लागवड झालेल्या संत्र्याचे क्षेत्र सध्या केवळ ३८.१0 हेक्टरवर आल्याचे दिसून येत आहे.