शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम निम्म्यावर; १७ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 11:10 IST

Crop Loan News : ३१ जुलैपर्यंत १७ हजार ३२० शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ४ हजार ७९१ शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. तथापि, खरीप हंगाम निम्म्यावर आला असताना, केवळ ८७,४६१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले असून, ३१ जुलैपर्यंत १७ हजार ३२० शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.वाशिम जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता खरीप आणि रब्बी हंगाम मिळून १ लाख १२ हजार ९३ शेतकऱ्यांना ११०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यात खरीप हंगामासाठी १ लाख ४ हजार ७९१ शेतकऱ्यांना १ हजार २५ कोटी रुपयांचे, तर रब्बी हंगामासाठी ७ हजार ३०२ शेतकऱ्यांना ७५  कोटी रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात खरीप हंगाम आता निम्म्यावर आला असतानाही ७१४ कोटी ६८ लाख रुपये ८६ हजरी ,८७९ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले असून, ३१ जुलैपर्यंत १७ हजार ९१२ शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पीक कर्ज वितरणात सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील बँकांची उदासीनता असून, या क्षेत्रातील बँकांना ३२ हजार १०९ शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज वितरण करावयाचे असताना, २९ जुलैपर्यंत केवळ १९ हजार ४०० शेतकऱ्यांना १८३ काेटी ८८ लाख  रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ५६.५८ टक्के आहे.  

सहकारी बँकेची पीक कर्ज वितरणात आघाडीजिल्ह्यात सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी ६२ हजार ९१८ शेतकऱ्यांना ६०५ काेटी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५९ हजार ८३९ शेतकऱ्यांना ४५२ काेटी २० लाख रुपयांचे पीक कर्ज या बँकेकडून वितरित करण्यात आले असून, हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या ७४.७३ टक्के आहे. अर्थात, दरवर्षी प्रमाणे यंदाही सहकार बँकेने पीक कर्ज वितरणात आघाडी कायम ठेवली आहे.

खासगी, सार्वजनिक बँकांना वावडेजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील १५ बँका मिळून ३२ हजार १०९ शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज वितरण करावयाचे असताना ३१  जुलैपर्यंत केवळ १९ हजार ९८२ शेतकऱ्यांना १९० काेटी ५४ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ५८.६३ टक्के आहे. अर्थात, पीक कर्ज वितरणाचे या बँकांना वावडे असल्याचे दिसते.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना शेतीवर केलेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा हजारो शेतकऱ्यांना पेरणीसह इतर खर्चासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे बँकेकडे पीक कर्जाचा प्रस्ताव सादर केला, परंतु खरीप हंगाम निम्मा उलटला, तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पायपीट करावी लागत आहे.- नितीन पाटील उपाध्ये, शेतकरी.

खरीप हंगामात बियाणे, खते व इतर खर्चांसाठी बँकेकडे पीक कर्जाची मागणी करावी लागते, परंतु यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही दीड ते दोन महिने कर्ज मिळत नाही. खरीप पेरणीची वेळ निघून जात असल्याने, उसणवार करून पेरणी करावी लागते. यंदाही अनेकांना याची प्रचिती आली. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका उदासीन आहेत.- घनश्याम ढोक, शेतकरी.

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्ज