शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वादळी वा-यासह गारपीट

By admin | Updated: March 10, 2015 01:55 IST

कारंजा, मानोरा व मंगरूळपीरमध्ये गारपीट; वाशिम, रिसोडात जोरदार तर मालेगावात तुरळक पाऊस.

वाशिम : जिल्हय़ात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळ वार्‍यासह गारपीट व जोरदार पाऊस ९ मार्च रोजी झाला. कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात गारपीट तर वाशिम, रिसोड येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. मालेगाव तालुक्यामध्ये तुरळक पाऊस झाला आहे. वाशिम शहरासह तालुक्यामध्ये संध्याकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाचे आगमन झाले. वादळ वार्‍यासह झालेल्या पावसाने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाचे आगमन झाल्याने बाजारपेठ बंद होऊन सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तालु क्यात वादळ-वार्‍यामुळे काही झाडे उन्मळून पडली असून, फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने यावर्षी आंबा मिळणे दुरापास्त होणार आहे. कारंजा तालुक्यात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये भाजीपाला, गहू, हरभरा, तसेच फळवर्गीय पिकांसह घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले. तालुक्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत वातावरण अगदी निरभ्र होते; परंतु सायंकाळी ५ वाजतानंतर एकाएकी आकाशात ढग निर्माण झाले आणि थोड्याच वेळाने वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपिटीला सुरुवात झाली. कारंजा शहरासह पोहा, शिवनगर, खेर्डा भागाई, विळेगाव, शहा, वालई, जयपूर, वाई गौळ, काळी कारंजा भडशिवणीसह तालुक्यात अनेक गावात वादळी वारा आणि गार िपटीने थैमान घातले. यामध्ये अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तसेच मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. त्याशिवाय आंबा, संत्रा, केळी, पपई, लिंबू आदी फळपिकांसह गहू, हरभरा, तसेच भाजी पाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजावरचे आर्थिक संकट अधिकच वाढले आहे. मानोरा तालुक्यात सोमवारी वादळी वार्‍यासह गारपिटीने थैमान घातले. यामध्ये पिकांचे मोठय़ा प्रमाणा त नुकसान झालेच, शिवाय वृक्ष उन्मळून पडले, घरांची पडझड झाली, तसेच काही ठिकाणी जनावरांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या.