शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

वाशिम जिल्ह्यात गारपीटीने २,१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:00 IST

२४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गुरूवार, २ जानेवारीला गारपीटीसह अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. या नैसर्गिक संकटाचा प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्यानुषंगाने कृषी व महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.जिल्ह्यात गतवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे जबर नुकसान झाले होते. त्यापोटी १७९.९९ कोटी रुपयांचा मदतनिधी शासनाकडून प्राप्त झाला. त्याचे वाटप सद्या बाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाच पुन्हा एकवेळी २ जानेवारीला गारपीट आणि अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घालून रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांमधील २१०० हेक्टरवरील पिकांना जबर फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रामुख्याने गहू, हरभरा, हळद, तूर या पिकांचे नुकसान झाले असून सरासरी उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे संकेत शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे.अवकाळी पाऊस, गारपीटीने बाधीत झालेली गावे२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर, देगाव, उमरा, जवळा यासह मानोरा तालुक्यातील वटफळ, रुईगोस्ता, शेंदूरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह इतर गावांमधील रब्बी हंगामातील पिकांना जबर फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

वाशिम तालुक्यातील बाधीत सातही गावांमध्ये कृषी सहायकांमार्फत बाधीत पिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात झालेल्या नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येईल.- अभिजित देवगिरीकरतालुका कृषी अधिकारी, वाशिम२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील सर्वाधिक १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले. उर्वरित मंगरूळपीर, कारंजा, रिसोड आणि मालेगाव या चार तालुक्यांमधील पिके सुस्थितीत आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी