शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गारपीटीने २,१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:00 IST

२४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गुरूवार, २ जानेवारीला गारपीटीसह अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. या नैसर्गिक संकटाचा प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्यानुषंगाने कृषी व महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.जिल्ह्यात गतवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे जबर नुकसान झाले होते. त्यापोटी १७९.९९ कोटी रुपयांचा मदतनिधी शासनाकडून प्राप्त झाला. त्याचे वाटप सद्या बाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाच पुन्हा एकवेळी २ जानेवारीला गारपीट आणि अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घालून रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांमधील २१०० हेक्टरवरील पिकांना जबर फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रामुख्याने गहू, हरभरा, हळद, तूर या पिकांचे नुकसान झाले असून सरासरी उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे संकेत शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे.अवकाळी पाऊस, गारपीटीने बाधीत झालेली गावे२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर, देगाव, उमरा, जवळा यासह मानोरा तालुक्यातील वटफळ, रुईगोस्ता, शेंदूरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह इतर गावांमधील रब्बी हंगामातील पिकांना जबर फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

वाशिम तालुक्यातील बाधीत सातही गावांमध्ये कृषी सहायकांमार्फत बाधीत पिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात झालेल्या नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येईल.- अभिजित देवगिरीकरतालुका कृषी अधिकारी, वाशिम२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील सर्वाधिक १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले. उर्वरित मंगरूळपीर, कारंजा, रिसोड आणि मालेगाव या चार तालुक्यांमधील पिके सुस्थितीत आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी