शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

वाशिम जिल्हय़ात पुन्हा गारपीट; पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:32 IST

वाशिम: जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.

ठळक मुद्देपेनबोरी येथे गोठा उद्ध्वस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.जिल्हय़ात १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेला. गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा गारपिटीने वाशिम, मालेगाव, रिसोड, मानोरा व मंगरुळपीर तालुक्याला झोडपले. १२ फेब्रुवारीला कारंजात गारपीट झाली होती. गहू, हरभरा यासह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी ‘गारद’ झाला आहे.अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून, शेतकर्‍यांना पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला. रविवारी रिसोड व मालेगाव तालुक्याला गारपिटीने झोडपून काढल्यानंतर सोमवारी कारंजा तालुक्यात गारपीट झाली. मंगळवारी वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर तालुक्यात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गारपीट झाली तर रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील रूई गोस्ता परिसरात गारपीेट झाली. वाशिम शहरातही सायंकाळी ५ वाजतानंतर अवकाळी पाऊस व गारपीट झाली. दरम्यान, रविवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील ८,५00 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले असून, सर्वेक्षणाचे काम सुरू असतानाच बुधवारी पुन्हा गारपीट झाली. त्यामुळे यापूर्वी सर्वेक्षण झालेल्या गावातही पुन्हा सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचेही वृत्त आहे. 

वाशिम तालुक्यातही नुकसानवाशिम: बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने गहू, हरभरा यासह भाजीपाला व फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. देपूळ, अनसिंग, धानोरा मापारी परिसरात पिकांच्या नुकसानाची तीव्रता अधिक आहे. वाशिम तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे बुधवारपासून केले जातील, अशी माहिती तहसीलदार बलवंत अरखराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मंगरुळपीर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊसशहरासह तालुक्यात १३ फेब्रुवारी रोजी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली होती.१३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले असून, काही प्रमाणात भाजीपाला व फळबागांनासुद्धा पावसाचा फटका बसला. आधीच नापिकी व कर्जबाजारीपणा तसेच शेतमालाला नसलेले भाव यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत असून, त्यातच या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक मदत द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची मागणी आहे.

गोवर्धन, किनखेडा, पेनबोरी, मसलापेन येथे गारपीटरिसोड: रविवारी सकाळी व रात्रीच्या सुमारास रिसोड तालुक्यातील २५ ते ३0 गावांना गारपिटीने झोडपून काढले होते. त्यानंतर आता पुन्हा १३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील गोवर्धन, किनखेडा, पेनबोरी, मसलापेन, वाडी रायताळ, पळसखेड, मोहजा इंगोले, भोकरखेडा, देगाव, धोडप, वाडीरायताळ यासह १0 ते १५ गावांत गारपीट झाली. गोवर्धन येथे जवळपास १२ ते १५ मिनिटे झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचा हातातील उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती गोवर्धन वाघ, युवा शेतकरी निखिल प्रभाकर वाघ यांनी दिली. किनखेडा येथील रेशीम उत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. पेनबोरी येथे एक गोठा उद्ध्वस्त झाला असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वाडी रायताळ, पळसखेडा परिसरात माजी पं.स. सभापती सुभाष खरात, तलाठी नरवाडे, ग्रामसेवक देशमाने यांनी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पाहणी केली असून, बुधवारी पंचनामे केले जातील, अशी माहिती तहसीलदार राजू सुरडकर यांनी दिली. 

टॅग्स :washimवाशिम