शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शाश्वत स्वच्छतेबाबत ग्रामस्तरावर मार्गदर्शन सभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:04 IST

वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. यात ग्रामस्थांना कुटूंबस्तर स्वच्छता तपासणीसह इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत सर्व ग्रामंपचायती हागणदरी मूक्त करण्यात आल्या असल्या तरी, अद्याप अनेक कुटूंबांनी शौचालय बांधलेले नाही, तसेच अनेक कुटूंबे शौचालय असतानाही त्याचा वापर करीत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्तरावर कुटुंबांनी शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन करणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा शाश्वत स्वच्छता आराखडा तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत घरोघरी भेट देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कारंजा तालुक्यातील सर्व ग्रा.प.चे आराखडे तयार झाले असून, वाशिम तालुक्यातील जांभरुण परांडे, मालेगाव तालुक्यातील एरंडा ग्रामपंचायतीचा आराखडा तयार करण्यात आला, तर मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सभा घेऊन स्वच्छता आराखडा निर्मितीबाबत जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाकडून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) सुदाम इस्कापे, तसेच माहिती व शिक्षण संवाद तज्ज्ञ राम श्रृंगारे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कुटुंबस्तर स्वच्छता स्थिती तपासणी कशी करावी, पाणी व्यवस्थापन व नियोजन कसे करावे, याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल काळे, शिक्षक डी. के. गवई, पोलीस पाटील सतिष क्षीरसागर, कोठारीचे उपसरपंच मुरलीधर सातपुते, मंगेश निळकंठ, रामचंद्र घोंगडे, रमेश राऊत, ग्रामसचिव शिंदे, मारोती देवरे, अंबिका लोखंडे, वसंतराव गवई, दत्ता माहुलकार, यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम