शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ग्रामसेवकांचे आंदोलन : ४७ दिवसांपासून ग्रामविकासाला खीळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:18 IST

मविकासाला बहुतांशी खीळ बसली असून शासकीय योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ९ आॅगस्टपासून विविध स्वरूपात आंदोलन पुकारले. मागण्या पूर्ण न झाल्याने १६ सप्टेंबरला ४७ व्या दिवशीही आंदोलन कायम होते. यामुळे मात्र ग्रामविकासाला बहुतांशी खीळ बसली असून शासकीय योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे.वेतनात असमानता, पदोन्नती संधी नाही, समान काम समान दाम, समकक्ष पदे समान वेतनश्रेणी, ग्रामसेवकांच्या शैक्षणिक अर्हता बदल करणे, लोकसंख्या आधारीत ग्रामविकास अधिकारी पदांत वाढ करणे, वेतन त्रुटी दुर करणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ देणे, अतिरिक्त कामे कमी करणे यासह इतरही अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने ९ आॅगस्ट, क्रांतीदिनापासून विविध स्वरूपात आंदोलनास सुरूवात केली. यादिवशी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील पंचायत समितीच्या कार्यालयांसमोर ग्रामसेवकांनी एकदिवशीय धरणे आंदोलन केले. दुसऱ्या टप्प्यात १३ आॅगस्टला वाशिमच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर सर्व ग्रामसेवकांनी एकत्र येत धरणे दिले. १६ आॅगस्ट रोजी विभागीय कार्यालयावर धरणे, १८ आॅगस्टला पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे देण्यात आले. याऊपरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने अखेर सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामपंचायत कार्यालयातील आलमारीत कुलूपबंद करून त्याच्या चाव्या त्या-त्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. यादरम्यान ११ सप्टेंबर रोजी शेकडो ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालय गाठून मुंडण करवून घेतले. प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुकारण्यात आलेले आंदोलन अद्याप सुरूच असल्याने विकासात्मक कामांना मात्र खीळ बसली आहे.

ग्रामसेवकांचा प्रभार स्विकारायला कुठलाच अन्य कर्मचारी तयार होईना; प्रशासन हतबलग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे ग्रामीण विकासाची सर्वच कामे प्रभावित झाली आहेत. शासनाकडून मंजूर होणाºया विविध योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे. दरम्यान, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध कर्मचाºयांकडून ग्रामसेवकांची कामे करून घ्यावी, असा फतवा ग्रामविकास विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढला. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवकांचा तात्पुरता प्रभार देण्यासंबंधी जिल्ह्यातील शिक्षक, विस्तार अधिकारी यांच्यासह अन्य कर्मचाºयांची चाचपणी देखील करण्यात आली; मात्र ग्रामसेवकांचा प्रभार स्विकारायला कुणीच तयार नाही. यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ असून प्रशासनही हतबल झाले आहे.

विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यभरातील ग्रामसेवकांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळेच यावेळी तीव्र स्वरूपातील आंदोलनांचे सत्र अवलंबिण्यात आले आहे. ९ आॅगस्टपासून आंदोलने सुरू असतानाही शासनाने अद्याप दखल घेतली नाही. हे आंदोलन राज्यस्तरीय असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही.- आत्माराम नवघरेजिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत