शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे आंदोलन : ४७ दिवसांपासून ग्रामविकासाला खीळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:18 IST

मविकासाला बहुतांशी खीळ बसली असून शासकीय योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ९ आॅगस्टपासून विविध स्वरूपात आंदोलन पुकारले. मागण्या पूर्ण न झाल्याने १६ सप्टेंबरला ४७ व्या दिवशीही आंदोलन कायम होते. यामुळे मात्र ग्रामविकासाला बहुतांशी खीळ बसली असून शासकीय योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे.वेतनात असमानता, पदोन्नती संधी नाही, समान काम समान दाम, समकक्ष पदे समान वेतनश्रेणी, ग्रामसेवकांच्या शैक्षणिक अर्हता बदल करणे, लोकसंख्या आधारीत ग्रामविकास अधिकारी पदांत वाढ करणे, वेतन त्रुटी दुर करणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ देणे, अतिरिक्त कामे कमी करणे यासह इतरही अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने ९ आॅगस्ट, क्रांतीदिनापासून विविध स्वरूपात आंदोलनास सुरूवात केली. यादिवशी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील पंचायत समितीच्या कार्यालयांसमोर ग्रामसेवकांनी एकदिवशीय धरणे आंदोलन केले. दुसऱ्या टप्प्यात १३ आॅगस्टला वाशिमच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर सर्व ग्रामसेवकांनी एकत्र येत धरणे दिले. १६ आॅगस्ट रोजी विभागीय कार्यालयावर धरणे, १८ आॅगस्टला पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे देण्यात आले. याऊपरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने अखेर सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामपंचायत कार्यालयातील आलमारीत कुलूपबंद करून त्याच्या चाव्या त्या-त्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. यादरम्यान ११ सप्टेंबर रोजी शेकडो ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालय गाठून मुंडण करवून घेतले. प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुकारण्यात आलेले आंदोलन अद्याप सुरूच असल्याने विकासात्मक कामांना मात्र खीळ बसली आहे.

ग्रामसेवकांचा प्रभार स्विकारायला कुठलाच अन्य कर्मचारी तयार होईना; प्रशासन हतबलग्रामसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे ग्रामीण विकासाची सर्वच कामे प्रभावित झाली आहेत. शासनाकडून मंजूर होणाºया विविध योजनांची अंमलबजावणीही ठप्प झाली आहे. दरम्यान, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावर उपलब्ध कर्मचाºयांकडून ग्रामसेवकांची कामे करून घ्यावी, असा फतवा ग्रामविकास विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढला. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवकांचा तात्पुरता प्रभार देण्यासंबंधी जिल्ह्यातील शिक्षक, विस्तार अधिकारी यांच्यासह अन्य कर्मचाºयांची चाचपणी देखील करण्यात आली; मात्र ग्रामसेवकांचा प्रभार स्विकारायला कुणीच तयार नाही. यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ असून प्रशासनही हतबल झाले आहे.

विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यभरातील ग्रामसेवकांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळेच यावेळी तीव्र स्वरूपातील आंदोलनांचे सत्र अवलंबिण्यात आले आहे. ९ आॅगस्टपासून आंदोलने सुरू असतानाही शासनाने अद्याप दखल घेतली नाही. हे आंदोलन राज्यस्तरीय असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही.- आत्माराम नवघरेजिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत