शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी सुरु

By admin | Updated: May 15, 2015 23:06 IST

बोगस ग्रामसभा प्रकरण.

राजुरा (जि. वाशिम) : मालेगाव पंचायत समिती अंतगर्ंत येत असलेल्या मौजे राजुरा येथील ग्रामपंचायतेच्या सरपंच व सचिवांनी ग्रामस्थांची दिशाभूल करुन १५ ऑगस्ट २0१४ रोजी ग्रामसभा घेतल्याचे दाखवून या ग्रामसभेत गावचे गुरे चराईसाठी असलेली सार्वजनिक शेतजमिनी नाहरकत प्रमाणपत्र पिंपळवाडी येथील काही जणांना देवाण - घेवाण करुन दिल्याची तक्रार राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते मनिष दत्तराव मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी गटविकास अधिकारी मालेगाव यांच्याकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला आहेत्र सदरहू तक्रार देवून जवळपास दिड महिन्याचे तर कालावधी होवूनही चौकशी सुरु झाली नसताना मनिष मोहळे यांनी वरिष्ठांना १२ मे २0१५ रोजी वरिष्ठांकडे रितसर नव्याने तक्रार दाखल करताच पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. सदरहू तक्रारीची दखल घेत १५ मे २0१५ रोजी तपास अधिकारी घुगे यांनी प्रत्यक्ष राजुरा येथे येवून तपासाला प्रारंभ केला आहे. सदरहू प्रकरणात दाखविण्यात आलेल्या उपस्थिती रजिस्टरवरील बहुतांश स्वाक्षर्‍यापैकी काही स्वाक्षर्‍या या केवळ ध्वजारोहणासाठी तर काही स्वाक्षर्‍या या गावामध्ये विकास योजना आणण्यासाठी तर काहीना गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी होत असल्याची बतावणी करुन घेण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्ते मनिष मोहरे यांच्यासह काही ग्रामसभेच्या उपस्थिती रजिस्टरवरील स्वाक्षरी केलेल्या नागरिकांनी केला आहे. बोगस ग्रामसभेतील अतिक्रमणीत शेतजमिनीच्या नाहरकत प्रमाणपत्रासह इतरही गैरप्रकारांच्या चौकशीला नुकताच प्रारंभ झाल्याने या प्रकरणात यापुढे काय होणार या बाबतची उत्सुकता जनतेला लागली आहे.