शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी सुरु

By admin | Updated: May 15, 2015 23:06 IST

बोगस ग्रामसभा प्रकरण.

राजुरा (जि. वाशिम) : मालेगाव पंचायत समिती अंतगर्ंत येत असलेल्या मौजे राजुरा येथील ग्रामपंचायतेच्या सरपंच व सचिवांनी ग्रामस्थांची दिशाभूल करुन १५ ऑगस्ट २0१४ रोजी ग्रामसभा घेतल्याचे दाखवून या ग्रामसभेत गावचे गुरे चराईसाठी असलेली सार्वजनिक शेतजमिनी नाहरकत प्रमाणपत्र पिंपळवाडी येथील काही जणांना देवाण - घेवाण करुन दिल्याची तक्रार राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते मनिष दत्तराव मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी गटविकास अधिकारी मालेगाव यांच्याकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला आहेत्र सदरहू तक्रार देवून जवळपास दिड महिन्याचे तर कालावधी होवूनही चौकशी सुरु झाली नसताना मनिष मोहळे यांनी वरिष्ठांना १२ मे २0१५ रोजी वरिष्ठांकडे रितसर नव्याने तक्रार दाखल करताच पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. सदरहू तक्रारीची दखल घेत १५ मे २0१५ रोजी तपास अधिकारी घुगे यांनी प्रत्यक्ष राजुरा येथे येवून तपासाला प्रारंभ केला आहे. सदरहू प्रकरणात दाखविण्यात आलेल्या उपस्थिती रजिस्टरवरील बहुतांश स्वाक्षर्‍यापैकी काही स्वाक्षर्‍या या केवळ ध्वजारोहणासाठी तर काही स्वाक्षर्‍या या गावामध्ये विकास योजना आणण्यासाठी तर काहीना गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी होत असल्याची बतावणी करुन घेण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्ते मनिष मोहरे यांच्यासह काही ग्रामसभेच्या उपस्थिती रजिस्टरवरील स्वाक्षरी केलेल्या नागरिकांनी केला आहे. बोगस ग्रामसभेतील अतिक्रमणीत शेतजमिनीच्या नाहरकत प्रमाणपत्रासह इतरही गैरप्रकारांच्या चौकशीला नुकताच प्रारंभ झाल्याने या प्रकरणात यापुढे काय होणार या बाबतची उत्सुकता जनतेला लागली आहे.