शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१५ दिवसांत सोने ३६०० रुपयाने घसरले; अक्षय्य तृतियानिमित्त बुकींग तेजीत!

By संतोष वानखडे | Updated: May 7, 2024 16:37 IST

भारतीयांना सोन्याचे विशेष आकर्षण आहे.

संतोष वानखडे, वाशिम : मार्च व एप्रिल महिन्यात किमतीचा उच्चांक गाठणाऱ्या सोन्याचे भाव मे महिन्यात घसरणीला लागल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वी प्रती तोळा ७४ हजार ५०० रुपये असलेले सोने ७ मे रोजी ७० हजार ९०० रुपयापर्यंत खाली घसरले.

भारतीयांना सोन्याचे विशेष आकर्षण आहे. गुंतवणुकीच्या सुरक्षित व खात्रीशीर पर्याय म्हणूनही अनेकजण सोने-चांदीच्या खरेदीकडे वळत आहेत. गत काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. मार्च २०२४ पासून सातत्याने तेजी होती. सोने, चांदीच्या दराने एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत विक्रमी उच्चांकावर मुसंडी मारली होती. गुढीपाडव्याच्या दिवशीदेखील सोन्याचे दर तेजीतच होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाल्याचे दिसून येते. २३ एप्रिल रोजी वाशिमच्या सराफा बाजारात २२ कॅरेट सोने प्रती तोळा ७४ हजार ५०० रुपये तर चांदी ८४ हजार रुपये किलो असे दर होते. यामध्ये जीएसटीचा समावेश नव्हता. ७ मे रोजी सोने प्रती तोळा ७० हजार ९०० तर चांदी प्रती किलो ८२ हजार रुपये असे भाव होते.

१५ दिवसांत भावात घसरण

फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रती तोळा ६२ हजार ९०० रुपये भाव होते. ३१ मार्च २०२४  रोजी ६८ हजार ७०० तर २३ एप्रिल रोजी ७४ हजार ५०० रुपये असा भाव होता. २३ एप्रिलनंतर अवघ्या १५ दिवसांत सोन्याच्या प्रती तोळा भावात ३६०० रुपयांची घसरण होत ७ मे रोजी वाशिमच्या सराफा बाजारात प्रती तोळा ७० हजार ९०० रुपये भाव होते.

दोन दिवसावर अक्षय्य तृतिया..

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीया या सणाकडे पाहिले जाते. सोने खरेदी, विवाह, गृहप्रवेश, नवीन वस्तू खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतियाचा मुहुर्त साधण्यासाठी अनेकजण सोने-चांदीचे बुकिंग करीत असल्याचे वाशिम येथील सराफा व्यावसायिक संजय भांडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Goldसोनं