शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

गारपिटग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या ! - भारिप-बमसंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:50 IST

वाशिम :  जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. 

ठळक मुद्दे बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली.अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३२९ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले असून ४२१ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत.त्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ५९ लाख ३२ हजार ३५० रुपये निधीची गरज आहे.

वाशिम :  जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. 

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले असून, तसा अहवाल शासनस्तरावर पाठविल्यानंतर शासनाकडून तातडीने नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी केली. जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाल्याचे सांगितले जाते. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी लागणार आहे.  शासनाने जाहिर केलेली हेक्टरी नुकसानभरपाईची रक्कमही तोकडी असून, हेक्टरी २० हजार रुपयांची मदत मिळणे अपेक्षीत आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी लागणार आहे.  बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३२९ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले असून ४२१ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ५९ लाख ३२ हजार ३५० रुपये निधीची गरज आहे. शासनाने तातडीने निधीची तरतूद करून शेतकºयांना दिलासा द्यावा अन्यथा भारिप-बमसंतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ