शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

गारपिटग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या ! - भारिप-बमसंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:50 IST

वाशिम :  जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. 

ठळक मुद्दे बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली.अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३२९ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले असून ४२१ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत.त्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ५९ लाख ३२ हजार ३५० रुपये निधीची गरज आहे.

वाशिम :  जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. 

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले असून, तसा अहवाल शासनस्तरावर पाठविल्यानंतर शासनाकडून तातडीने नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी केली. जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाल्याचे सांगितले जाते. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी लागणार आहे.  शासनाने जाहिर केलेली हेक्टरी नुकसानभरपाईची रक्कमही तोकडी असून, हेक्टरी २० हजार रुपयांची मदत मिळणे अपेक्षीत आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी लागणार आहे.  बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३२९ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले असून ४२१ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ५९ लाख ३२ हजार ३५० रुपये निधीची गरज आहे. शासनाने तातडीने निधीची तरतूद करून शेतकºयांना दिलासा द्यावा अन्यथा भारिप-बमसंतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ