शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

गारपिटग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या ! - भारिप-बमसंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:50 IST

वाशिम :  जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. 

ठळक मुद्दे बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली.अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३२९ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले असून ४२१ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत.त्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ५९ लाख ३२ हजार ३५० रुपये निधीची गरज आहे.

वाशिम :  जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली. 

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले असून, तसा अहवाल शासनस्तरावर पाठविल्यानंतर शासनाकडून तातडीने नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी केली. जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाल्याचे सांगितले जाते. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी लागणार आहे.  शासनाने जाहिर केलेली हेक्टरी नुकसानभरपाईची रक्कमही तोकडी असून, हेक्टरी २० हजार रुपयांची मदत मिळणे अपेक्षीत आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी लागणार आहे.  बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३२९ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले असून ४२१ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ५९ लाख ३२ हजार ३५० रुपये निधीची गरज आहे. शासनाने तातडीने निधीची तरतूद करून शेतकºयांना दिलासा द्यावा अन्यथा भारिप-बमसंतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ