शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

घंटागाडी असूनही मालेगाव शहरात कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 15:27 IST

मालेगाव (वाशिम) : मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मालेगाव शहरात घंटागाड्या फिरत आहे. तरीही अनेक व्यवसायिक आपल्या दुकानातील व दुकानासमोरील कचरा रस्त्यावर आणून टाकतात तसेच रस्त्यावरच हा कचरा जाळून टाकला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मालेगाव शहरात घंटागाड्या फिरत आहे. तरीही अनेक व्यवसायिक आपल्या दुकानातील व दुकानासमोरील कचरा रस्त्यावर आणून टाकतात तसेच रस्त्यावरच हा कचरा जाळून टाकला जात आहे. यामुळे मालेगाव शहरात घंटागाड्या आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.मालेगाव नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर तब्बल अडीच ते तीन वर्षांनी मालेगावात घंटागाड्या सुरू झाल्या आणि प्रत्येक प्रभागात जाऊन त्या घंटागाड्या कचरा जमा करत आहेत. त्यामुळे जागोजागी कचरा तयार होण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. प्रभागातील गृहिणी तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिक या घंटागाडीत नित्यनेमाने कचरा टाकत आहेत. मात्र जुन्या बस स्थानकावरील  अनेक व्यावसायिक तसेच मुख्य रस्त्यावरील जोगदंड  हॉस्पिटल ते शिव चौक येथील व्यवसाययिक आपला कचरा तसेच दुकान झाडल्यानंतरचा कचरा सुद्धा रस्त्यावर आणून टाकत आहेत. शहरात कचरा गाड्या फिरून कचरा जमा करत आहेत तर मग व्यवसायिक लोक आपल्या दुकानातील कचरा रस्त्यावर का टाकतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागोजागी असलेले कचºयाचे ढीग पाहून ‘सोनू तुला कचरा गाडीवर भरोसा नाही काय’ असे एका गीतातून उपहासात्मक बोलल्या जात आहे. नगर पंचायत प्रशासनाने कचरा रस्त्यावर टाकणाºयाला तंबी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरत आहे तर काही वेळा कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे धूर निघतो. हा प्रकार बंद होणे आवश्यक ठरत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव