शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

धाग्याच्या सहा हजार रिळ वापरून केली गणेशमूर्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:08 IST

धाग्याच्या सहा हजार रिळ आणि लोकराचा वापर करून आकर्षक अशी गणेशमूर्ती स्थापन केली आहे

पर्यावरणपुरक उपक्रम: कारंजातील बाल हौशी गणेश मंडळाची परंपरा लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड:  गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण पुरक गणेशोत्सवाची परंपरा जपणाºया कारंजा शहरातील बाल हौशी गणेश मंडळाने यंदा या परंपरेत आणखी एक कडी जोडली आहे. त्यांनी यंदा शिवणकामासाठी वापरल्या जाणाºया धाग्याच्या सहा हजार रिळ आणि लोकराचा वापर करून आकर्षक अशी गणेशमूर्ती स्थापन केली आहे. ही मूर्ती शहरातील गणेशभाविकांचे लक्ष वेधत आहे. े दिवंसेदिवस पर्यावरणाचा ºहास होऊन त्याचे भीषण वाईट परिणाम मानवी जिवनावर होत असतानाही बदल करण्याचे प्रयत्न अपेक्षीत प्रमाणात होत नाहीत. ही बाब विविध धार्मिक उत्सवातही दिसते. तथापि, अनेक गणेश मंडळे, दुर्गोत्सव मंडळे पर्यावरणपुरक उत्सव साजरा करून समाजासमोर आदर्शही निर्माण करीत आहेत. त्यात कारंजा शहरातील भाजी बाजार परिसरातील बाल हौशी गणेश मंडळाचा समावेश आहे. हे गणेश मंडळ गेल्या २० वर्षांपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करते. यासाठी ते निर्माल्याचे विसर्जन करताना पाणी प्रदुषित न होऊ देणे, गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषण टाळत सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य करते. यंदाही त्यांनी ही परंपरा राखत. सहा हजार रिळ आणि लोकर वापरून आकर्षक गणेशमूर्ती तयार केली. ही मूर्ती मंडळातील मूर्तीकार अमित  कºहे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी मिळून तयार केली. यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवा कºहे, उपाध्यक्ष रोहित परकोटे, सचिव मनोज देशमुख कोषाध्यक्ष सचिन विभुते, सदस्य आकाश कºहे, विजय शर्मा, चंद्रशेखर कडेल, गजानन वलीवकर, नवीन डांगुर निशांत गुलालकरी, संयम गुलालकरी, राज विभुते, शिवा ब्राह्मणे, शुभम राऊळ, स्वप्नील   बंड, प्रकल्प वैद्य, कौशल  बंड, रितेश  गुलालकरी, गुरु यवतेकर, मंगेश वैद्य, आशिष  वैद्य, सचिन  देशमुख , रितेश डांगुर, गौरव डांगुर, समीर बन्नौरे, सचिन बाखडे, गौरव सौरभ विभुते, आकाश व्यवहारे, स्वरूप कºहे तसेच सल्लागार अनंतराव कºहे, मंगेश कडेल, बाळूभाऊ यवतेकर आणि शरद कºहे आदिंनी सहकार्य केले.    एक हजार बटणचा वापरकारंजातील बाल हौशी गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी धाग्याच्या सहा हजार रिळ वापरल्या, तसेच ही मूर्ती आकर्षक करण्यासाठी त्यांनी एक हजार बटणही वापरले आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनीही परिश्रम घेत आहेत.  मूर्तीसाठी दरवर्षी नवे साहित्य गेल्या २० वर्षांपासून कारंजातील बाल हौशी गणेश मंडळ पर्यावरणपुरक गणेशमूर्ती तयार करीत असले तरी, एकदाही त्यांनी मूर्तीसाठी पूर्र्वीच्या साहित्याचा वापर केला नाही. कधी नारळापासून, कधी बांबूपासून, कधी पणत्यांपासून, कधी कवड्यांपासून, कधी गवतापासून, तर कधी शिंपल्यापासून त्यांनी आकर्षक अशा गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. त्यांचा हा उपक्रम इतर गणेश मंडळांसाठी आदर्श ठरणारा आहे.

टॅग्स :washimवाशिमGanesh Mahotsavगणेशोत्सव