शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

कोरोनाच्या परिस्थितीवर जिल्हा कृषी महोत्सवांचे भवितव्य अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 4:43 PM

कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

वाशिम : शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करणे, ग्राहक ते शेतकरी थेट शेतमाल विक्रीची जोड घालणे आदी उद्देशाने दरवर्षी राज्यात जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास हा महोत्सव घेण्यात यावा अन्यथा २०२१-२२ मध्ये आयोजन करावे, अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने १६ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या.बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देणे, प्रयोगशील व प्रगतशील शेतकºयांच्या माध्यमातून इतर शेतकºयांना विचाराची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देणे, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संधी आदी उद्देशातून सन २०१७ पासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद, प्रगतशील शेतकरी किंवा उद्योजकांची व्याख्याने, धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव आदींचे आयोजन करण्यात येते. परंतू, यंदा कोरोनाचे सावट असल्याने आणि कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कृषी विभागाने जिल्हा कृषी महोत्सवासंदर्भात जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास सन २०२०-२१ या वर्षात कृषी महोत्सव घेण्यात यावा अन्यथा पुढील आर्थिक वर्षात अर्थात २०२१-२२ मध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करावे, अशा सूचना कृषी विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १६ आॅक्टोबरला दिल्या. त्यानुसार वाशिमसह अमरावती विभागात चालू आर्थिक वर्षात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर कृषी महोत्सव होईल अन्यथा यंदाचा कृषी महोत्सव रद्दही होऊ शकतो, असा अंदाज कृषी विभागातून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र