शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कारंजा तालुक्यात वृक्ष लागवडीचे ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:31 IST

कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड  (वाशिम) :  सन २०१६ पासून महाराष्ट्र शासनाच्यावतीने वृक्षलागवड कार्यक्रमाला विशेष महत्व देण्यात आले असून या अंतर्गत राज्याला ३३ कोटी वृक्षलागडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अनुषंगाने सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. उद्दिष्ट पुर्तीसाठी ३ आठवडे एवढा अवधी शिल्लक असून तोपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असा विश्वास वनविभागाच्यावतिने व्यक्त करण्यात आला. मागील काही दिवसांत राज्यातील वृक्षाचे प्रमाण कमी झाल्याने ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या जन्माला आली. यामुळे वातावरणात सतत बदल होत असून तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने राज्यात वृक्षलागवड कार्यक्रमाला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून घोषित केले. या कार्यक्रमा अंतर्गत राज्यात सन २०१६ मध्ये १ जुलै या एका दिवसात २ कोटी, सन २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै ते या काळात ४ कोटी, सन २०१८ मध्ये १ ते ३१ जुलै यादरम्यान १३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली असून सन २०१९ साठी १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या काळात राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  या अनुषंगाने कारंजा वनपरीक्षेत्र. कार्यालय, समाजिक वनीकरण विभाग व इतर विभागाच्या वतीने कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून याकरिता वनविभागाच्या वतीने रोपवाटप करण्यात आले. १ जुलैपासून वृक्षलागवडीस प्रारंभ करण्यात आला. दरम्यान कारंजा वनपरीक्षेत्र कार्यालयाला १ लाख २७ हजार ४०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत सदर कार्यालयाच्या वतीने १०० टक्के उद्दिष्टपुर्ती झाली आहे. शिवाय सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनेही उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले आहे. परंतु तालुक्यातील इतर प्रशासकीय विभागाच्या वतीने मात्र अद्यापपर्यंत उद्दिष्टपुर्ती न करण्यात आल्याने उद्दिष्टपुर्तीचा आकडा ७० टक्क्यांवर थांबला आहे. पुढील तीन आठवड्यात अद्यापपर्यंत रोप न नेणाºया प्रशासकीय विभागाने कारंजा वनपर्यटन केंद्रातून रोपे नेउुन वृक्षलागवड करावी तसेच वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपुर्तीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद इढोळे यांनी केले आहे.  सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्ष्टि देण्यात आले आहे. आजपर्यंत तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून उर्वरित उद्दिष्टही लवकरच पूर्ण करण्यात येईल- अरविंद इढोळेवनपरिक्षेत्र अधिकारी, कारंजा

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम