शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कारंजा तालुक्यात वृक्ष लागवडीचे ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:31 IST

कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड  (वाशिम) :  सन २०१६ पासून महाराष्ट्र शासनाच्यावतीने वृक्षलागवड कार्यक्रमाला विशेष महत्व देण्यात आले असून या अंतर्गत राज्याला ३३ कोटी वृक्षलागडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अनुषंगाने सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. उद्दिष्ट पुर्तीसाठी ३ आठवडे एवढा अवधी शिल्लक असून तोपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असा विश्वास वनविभागाच्यावतिने व्यक्त करण्यात आला. मागील काही दिवसांत राज्यातील वृक्षाचे प्रमाण कमी झाल्याने ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या जन्माला आली. यामुळे वातावरणात सतत बदल होत असून तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने राज्यात वृक्षलागवड कार्यक्रमाला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून घोषित केले. या कार्यक्रमा अंतर्गत राज्यात सन २०१६ मध्ये १ जुलै या एका दिवसात २ कोटी, सन २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै ते या काळात ४ कोटी, सन २०१८ मध्ये १ ते ३१ जुलै यादरम्यान १३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली असून सन २०१९ साठी १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या काळात राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  या अनुषंगाने कारंजा वनपरीक्षेत्र. कार्यालय, समाजिक वनीकरण विभाग व इतर विभागाच्या वतीने कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून याकरिता वनविभागाच्या वतीने रोपवाटप करण्यात आले. १ जुलैपासून वृक्षलागवडीस प्रारंभ करण्यात आला. दरम्यान कारंजा वनपरीक्षेत्र कार्यालयाला १ लाख २७ हजार ४०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत सदर कार्यालयाच्या वतीने १०० टक्के उद्दिष्टपुर्ती झाली आहे. शिवाय सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनेही उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले आहे. परंतु तालुक्यातील इतर प्रशासकीय विभागाच्या वतीने मात्र अद्यापपर्यंत उद्दिष्टपुर्ती न करण्यात आल्याने उद्दिष्टपुर्तीचा आकडा ७० टक्क्यांवर थांबला आहे. पुढील तीन आठवड्यात अद्यापपर्यंत रोप न नेणाºया प्रशासकीय विभागाने कारंजा वनपर्यटन केंद्रातून रोपे नेउुन वृक्षलागवड करावी तसेच वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपुर्तीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद इढोळे यांनी केले आहे.  सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्ष्टि देण्यात आले आहे. आजपर्यंत तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून उर्वरित उद्दिष्टही लवकरच पूर्ण करण्यात येईल- अरविंद इढोळेवनपरिक्षेत्र अधिकारी, कारंजा

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम