शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘मोफत औषधी वाटप’ उपक्रम बारगळण्याच्या मार्गावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:33 IST

आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे मोफत वाटप केले जाणार होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातही होत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील १० लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे मोफत वाटप केले जाणार होते. मात्र, या औषधीवर मध्यंतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने जिल्हा परिषदेने हा उपक्रमही तुर्तास थांबविला. राज्याचा आरोग्य विभाग व राज्य शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन व दिशानिर्देश मिळाल्यानंतर हा उपक्रम राबविण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने स्पष्ट केले.अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. ९० पेक्षा अधिक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा धोका वाढलेला असल्याने ग्रामीण भागात आरोग्य विभागातर्फे विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालय यांचे निर्णयानुसार कोरोना ससंर्ग टाळण्यासाठी तसेच या आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने काही औषधांच्या शिफारसी केल्या. त्यापैकी अर्सेनिक अल्बम ३० व संशमनी वटी हे होमिओपॅथी व आयुर्वेदीक औषध कोरोना आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते, अशी शिफारस मध्यंतरी झाली होती. त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने शिल्लक निधीमधून या औषधाचा ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. परंतू, त्यानंतर होमिओपॅथी व आयुर्वेदीक औषधीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने आरोग्य समितीने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका ठेवत आरोग्य विभाग व शासनाकडून मार्गदर्शन मागविले. अद्याप स्पष्ट सूचना प्राप्त न झाल्याने हा निर्णयही अधांतरीच आहे.

प्रस्ताव तयार ; मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच कार्यवाहीरोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे वाटप करावे की नाही याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. औषधीसंदर्भातील प्रस्तावही तयार आहे. शासनाकडून स्पष्ट सूचना प्राप्त होताच, मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना औषधीचे वाटप केले जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठापावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तसेच कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात सर्दी, खोकला, ताप, अतिसार यासह अन्य महत्वाचा औषधी साठा उपलब्ध करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आयुर्वेद व होमिओपॅथी औषधीचे मोफत वाटप ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना करण्याचा निर्णय घेतला होता. मध्यंतरी या औषधीसंदर्भात द्विधा स्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय थांबविण्यात आला. शासनाकडून स्पष्ट दिशानिर्देश प्राप्त होताच, या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

- चक्रधर गोटे,आरोग्य सभापती, जि.प. वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद