शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

चार एकरातील पिकात साचले गुडघाभर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:49 IST

शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवार २६ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर जाऊन शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे आलेल्या नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसले असून, आनंद तोतला या शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे. त्यामुळे अतोनात नुकसान झाल्याने ते हताश झाले आहेत. या नुकसानाची पाहणी पीकविमा कंपनी आणि प्रशासनाने करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ुमानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात गत काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी या परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे इंझोरी येथील दापुरा-इंझोरी नाल्याला पूर गेला. या पुरात अनेक शेतकºयांची शेतीच खरडून पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यातच येथील शेतकरी आनंद तोतला यांच्या चार एकर क्षेत्रातील सोयाबीन व कपाशी पूर्णपणे उद्धस्त झाली असून, त्यांच्या शेतात अद्यापही गुडघ्याएवढे उंच पाणी साचले आहे. त्यामुळे या पिकातून आता कवडीचेही उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. त्यामुळे या शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागासी पीकविमा कंपनीने या नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयाने केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी