शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:32 IST

लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली आहेत.

ठळक मुद्देवन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली तर सौर ऊर्जेवर चालणारे जवळपास २०० लाईट बंदस्थितीत आहेत. वन उद्यानात सुविधांचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उद्यानात सौर उर्जेवर चालणारे २१० लाईट बसविण्यात आले आहे. यातील सर्वच लाईट बंद आहेत.

शीतल धांडे 

रिसोड - लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली तर सौर ऊर्जेवर चालणारे जवळपास २०० लाईट बंदस्थितीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रिसोड शहरात एकही उद्यान नसल्याने साधारणत: तीन वर्षांपूर्वी वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. यासाठी लाखो रुपयांचा  खर्च झाला. येथे बच्चे कंपनीसाठी खेळण्याचे विविध साहित्य आहे.  सोमवारी (२२ एप्रिल) येथील वन उद्यानाची पाहणी केली असता, वन उद्यानाच्या मूळ उद्देशाला तडा जात असल्याचे चित्र समोर आले. योग्य देखभाल नसल्याने वन उद्यान भकास झाले आहे. पाणी नसल्याने उद्यानातील झाडे सुकून गेल्याचे दिसून येते. सकाळ व सायंकाळच्या सुमारास या उद्यानात फिरण्यासाठी काही नागरिक, महिला येतात. उद्यान भकास दिसत असल्याने उद्यानात येणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते. 

वन उद्यानात सुविधांचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उद्यानात पिण्यासाठी पाणीसुद्धा उपलब्ध नाही. उद्यानात सौर उर्जेवर चालणारे २१० लाईट बसविण्यात आले आहे. यातील सर्वच लाईट बंद आहेत. बहुतांश लाईटची बॅटरी सुध्दा चोरीला गेल्याचे दिसून आले. मुख्य प्रवेशद्वारासमोरील लाईट कधी बंद तर कधी कधी सुरु असतो. सौर ऊर्जेवर चालणारा पाण्याचा पंप सुद्धा बंद अवस्थेत आहे. महाशिवरात्रीपासुन येथील वन परीक्षेत्र अधिकारी वानखेडे  हे रजेवर असल्याची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. उद्यानातील मुलांचे खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. यामध्ये चार पाळणे व छत्र्या सुद्धा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. घसरगुंडी सुद्धा तुटली आहे. तीन बोअर असुन सुद्धा उद्यानातील बरीच झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. 

वन उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याकरीता मोठया प्रमाणात नविन साहित्य आलेले आहे. परंतु देखभालअभावी ते सुध्दा कित्येक दिवसांपासबन धुळ खात पडले आहे. उद्यानात रोपवाटिका असुन खैरी, साग, सिताफळ, चिंच, गुलमोहर, कविट, चिल्लारी रोप, लिंब, कांचन, बांबु आदी रोपे आहेत. पाणीटंचाईमुळे रोपवाटिका जगविण्याचे आव्हान वन विभागासमोर उभे ठाकले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी