शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:32 IST

लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली आहेत.

ठळक मुद्देवन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली तर सौर ऊर्जेवर चालणारे जवळपास २०० लाईट बंदस्थितीत आहेत. वन उद्यानात सुविधांचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उद्यानात सौर उर्जेवर चालणारे २१० लाईट बसविण्यात आले आहे. यातील सर्वच लाईट बंद आहेत.

शीतल धांडे 

रिसोड - लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली तर सौर ऊर्जेवर चालणारे जवळपास २०० लाईट बंदस्थितीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रिसोड शहरात एकही उद्यान नसल्याने साधारणत: तीन वर्षांपूर्वी वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. यासाठी लाखो रुपयांचा  खर्च झाला. येथे बच्चे कंपनीसाठी खेळण्याचे विविध साहित्य आहे.  सोमवारी (२२ एप्रिल) येथील वन उद्यानाची पाहणी केली असता, वन उद्यानाच्या मूळ उद्देशाला तडा जात असल्याचे चित्र समोर आले. योग्य देखभाल नसल्याने वन उद्यान भकास झाले आहे. पाणी नसल्याने उद्यानातील झाडे सुकून गेल्याचे दिसून येते. सकाळ व सायंकाळच्या सुमारास या उद्यानात फिरण्यासाठी काही नागरिक, महिला येतात. उद्यान भकास दिसत असल्याने उद्यानात येणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते. 

वन उद्यानात सुविधांचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उद्यानात पिण्यासाठी पाणीसुद्धा उपलब्ध नाही. उद्यानात सौर उर्जेवर चालणारे २१० लाईट बसविण्यात आले आहे. यातील सर्वच लाईट बंद आहेत. बहुतांश लाईटची बॅटरी सुध्दा चोरीला गेल्याचे दिसून आले. मुख्य प्रवेशद्वारासमोरील लाईट कधी बंद तर कधी कधी सुरु असतो. सौर ऊर्जेवर चालणारा पाण्याचा पंप सुद्धा बंद अवस्थेत आहे. महाशिवरात्रीपासुन येथील वन परीक्षेत्र अधिकारी वानखेडे  हे रजेवर असल्याची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. उद्यानातील मुलांचे खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. यामध्ये चार पाळणे व छत्र्या सुद्धा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. घसरगुंडी सुद्धा तुटली आहे. तीन बोअर असुन सुद्धा उद्यानातील बरीच झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. 

वन उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याकरीता मोठया प्रमाणात नविन साहित्य आलेले आहे. परंतु देखभालअभावी ते सुध्दा कित्येक दिवसांपासबन धुळ खात पडले आहे. उद्यानात रोपवाटिका असुन खैरी, साग, सिताफळ, चिंच, गुलमोहर, कविट, चिल्लारी रोप, लिंब, कांचन, बांबु आदी रोपे आहेत. पाणीटंचाईमुळे रोपवाटिका जगविण्याचे आव्हान वन विभागासमोर उभे ठाकले आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी