शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
2
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
3
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
4
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
5
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
6
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
7
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
8
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
9
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
10
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
11
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
13
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
14
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
15
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
16
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
17
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
18
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
19
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
20
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात चाराटंचाई; पशुपालक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:17 IST

रिसोड : गतवर्षी पडलेल्या अपुºया पावसामुळे रिसोड तालुक्यातील पशुपालकांना यावर्षी चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाºयाच्या बाजारभावातही वाढ झाल्याने पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : गतवर्षी पडलेल्या अपुºया पावसामुळे रिसोड तालुक्यातील पशुपालकांना यावर्षी चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाºयाच्या बाजारभावातही वाढ झाल्याने पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे.गतवर्षी रिसोड तालुक्यात पावसाने सरासरी गाठली नाही. एकूण सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. तालुक्यातील प्रकल्पातही सध्या सरासरी पाच टक्के जलसाठा आहे. त्यापैकी १० प्रकल्प तर कोरडेठण्ण आहेत. गतवर्षीच्या खरिप हंगामात शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. प्रकल्पांत पाणी नसल्याने आणि भूजलपातळीत घट झाल्याने जनावरांसाठी हिरवा चाराही शेतकºयांना घेत आला नाही. जिल्ह्यात केवळ रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे, यावरून तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती लक्षात येते. मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याने तालुक्यात चारा छावणी सुरू होणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप चारा छावणी सुरू झालेली नाही. चारा टंचाई असल्याने चाºयाच्या बाजारभावात कमालीची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ ते २० टक्क्याने सुका व ओल्या चाºयाच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईच्या पृष्ठभूमीवर चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.जिल्ह्यातील चाºयाची परजिल्ह्यात वाहतूक .. जिल्ह्यात चाराटंचाई असल्याने जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर निर्बंध आहेत. तथापि, याकडे दुर्लक्ष करीत जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यातील काही ठिकाणांवरून परजिल्ह्यात चाºयाची विक्री होत असल्याचे दिसून येते. परजिल्ह्यातील पशुपालक जादा दर देत असल्याने ही चाराविक्री होत असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील जनावरांचा चारा परजिल्ह्यात जाऊ नये याकरीता प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे.

पाणीटंचाईची तिव्रता वाढली..रिसोड तालुक्यात सध्या तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुपालकांच्या समस्येत भर पडली आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करताना पशुपालकांच्या नाकीनऊ येत आहे. काही गावांमध्ये माणसांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी कोसोदूर पायपिट करावी लागत असल्याने तेथे जनावरांसाठी पाणी उपलब्ध करताना पशुपालकांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती