शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सणासुदीत फुलांचे भाव तिप्पट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:12 IST

रिसोड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या फुलांचे भाव तिप्पट ते चौपट वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड  (वाशिम) : ऐन सणासुदीच्या काळात रिसोड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या फुलांचे भाव तिप्पट ते चौपट वाढले आहेत. यामुळे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.शुक्रवारी बाजारात फुलाचे भाव वाढल्यामुळे गौरी पूजेला लागणाºया हाराची किंमत दुप्पट, तिप्पट झाली होती. सध्या बाजारात फुलांचा तुटवडा असून ज्या फुलांचे भाव मागील वर्षी १०० रुपये किलो होते, ती फुले यावर्षी ३०० रुपये किलो विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे फुलांचे भाव वाढल्याचे फुल विक्रेते मनोहर जहीरव यांनी सांगितले. गौरी गणपती सण एकाच वेळी आल्याने शुक्रवार रिसोड येथील बाजारात फुलाचा तुटवडा जाणवला. शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविकांनी फुल तसेच फुलांचे हार खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली होती. शनिवारीदेखील फुल खरेदीसाठी भाविकांची गर्दी दिसून आली. अनेकांनी झेंडूचे फुले घेऊन घरीच हार तयार करण्यात पसंती दिली. मागील वर्षी हाराच्या किंमती दीडशे रुपये जोडी अशा होत्या. यावर्षी तीनशे रुपये जोडी किंमतीने हार विक्री झाली. गतवर्षी ३०० रुपये हाराची किंमत असलेला हार यावर्षी ७५१ रुपयाला विक्री करण्यात आले. मागील वर्षी झेंडूचे भाव ३० ते ४० रुपये किला असे होते. यावर्षी तेच भाव शंभर रुपये किलो होते. शेवंती शंभर रुपयावरून यावर्षी ३०० रुपये किलो, निशिगंधा २०० रुपयावरून ४०० रुपये अशा फुलांच्या किंमती वाढल्या. फुुल विक्रेते जहिरव म्हणाले की, हैद्राबाद, अहमदनगर, नांदेड येथून फुले आणावी  लागतात. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या दरानुसार ग्राहकांना फुलांची विक्री करावी लागते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMarketबाजार