शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचेच फटाके! सुरेश मापारी, वैभव सरनाईक, अशोक डोंगरदिवे, वैशाली लळे यांचा विजय

By संतोष वानखडे | Updated: October 20, 2022 19:10 IST

Washim News: बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे.

- संतोष वानखडेवाशिम - बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. गुरूवारी (दि.२०) पार पडलेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश मापारी, कॉंग्रेसचे वैभव सरनाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक डोंगरदिवे तर वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली लळे यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करीत विजय मिळविला.

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तिन्ही पक्षाने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन २०२० मध्ये सत्ता स्थापन केली होती. अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीने हाच फार्म्यूला कायम ठेवल्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे चक्रधर गोटे यांची अविरोध निवड झाली. चार विषय समित्यांच्या सभापती पदासाठी २० ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात निवडणुक पार पडली. समाजकल्याण समितीसाठी अशोक डोंगरदिवे (राकाॅं), श्याम बढे (भाजपा) व वनिता देवरे (वंचित बहुजन आघाडी) यांची उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी वनिता देवरे यांनी माघार घेतल्याने दोघांमध्ये थेट लढत झाली. डोंगरदिवे यांना ३६ तर बढे यांना १६ मते मिळाल्याने डोंगरदिवे यांना विजयी घोषित करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीसाठी वैशाली लळे (वंचित), अश्विनी तहकिक (जनविकास), कल्पना राऊत (वंचित), लक्ष्मी लहाने (वंचित) व सुनिता कोठाळे (राकाॅं) यांनी अर्ज दाखल केले. कोठाळे व लहाने यांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरीत तीन उमेदवारांमध्ये लढत झाली. सर्वाधिक ३४ मते घेतल्याने लळे यांनी विजयी घोषित केले तर तहकिक (१६) व राऊत (२) यांचा पराभव झाला. दोन विषय समितीसाठी सुरेश मापारी (शिवसेना), वैभव सरनाईक (कॉंग्रेस), संध्या विरेंद्र देशमुख ( कॉंग्रेस बंडखोर), उमेश ठाकरे (भाजपा) यांच्यासह नंदाबाई डोफेकर, अश्विनी तहकिक, आशिष दहातोंडे, सुनिता कोठाळे अशा आठ जणांनी अर्ज भरले होते. यापैकी चार जणांनी माघार घेतल्याने मापारी, सरनाईक, देशमुख व ठाकरे यांच्यात लढत झाली. सर्वाधिक ३५ मते वैभव सरनाईक यांना तर सुरेश मापारी यांना ३४ मते मिळाल्याने या दोघांनाही विजयी घोषित करण्यात आले. संध्या देशमुख (१८) व उमेश ठाकरे (१७) यांचा पराभव झाला.

टॅग्स :washimवाशिम