शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचेच फटाके! सुरेश मापारी, वैभव सरनाईक, अशोक डोंगरदिवे, वैशाली लळे यांचा विजय

By संतोष वानखडे | Updated: October 20, 2022 19:10 IST

Washim News: बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे.

- संतोष वानखडेवाशिम - बंडखोरीमुळे जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीची निवडणूक अविरोध करण्याचे मनसुबे धूळीस मिळाले असले तरी जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. गुरूवारी (दि.२०) पार पडलेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश मापारी, कॉंग्रेसचे वैभव सरनाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक डोंगरदिवे तर वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली लळे यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करीत विजय मिळविला.

जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तिन्ही पक्षाने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन २०२० मध्ये सत्ता स्थापन केली होती. अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीने हाच फार्म्यूला कायम ठेवल्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे चक्रधर गोटे यांची अविरोध निवड झाली. चार विषय समित्यांच्या सभापती पदासाठी २० ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात निवडणुक पार पडली. समाजकल्याण समितीसाठी अशोक डोंगरदिवे (राकाॅं), श्याम बढे (भाजपा) व वनिता देवरे (वंचित बहुजन आघाडी) यांची उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी वनिता देवरे यांनी माघार घेतल्याने दोघांमध्ये थेट लढत झाली. डोंगरदिवे यांना ३६ तर बढे यांना १६ मते मिळाल्याने डोंगरदिवे यांना विजयी घोषित करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीसाठी वैशाली लळे (वंचित), अश्विनी तहकिक (जनविकास), कल्पना राऊत (वंचित), लक्ष्मी लहाने (वंचित) व सुनिता कोठाळे (राकाॅं) यांनी अर्ज दाखल केले. कोठाळे व लहाने यांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरीत तीन उमेदवारांमध्ये लढत झाली. सर्वाधिक ३४ मते घेतल्याने लळे यांनी विजयी घोषित केले तर तहकिक (१६) व राऊत (२) यांचा पराभव झाला. दोन विषय समितीसाठी सुरेश मापारी (शिवसेना), वैभव सरनाईक (कॉंग्रेस), संध्या विरेंद्र देशमुख ( कॉंग्रेस बंडखोर), उमेश ठाकरे (भाजपा) यांच्यासह नंदाबाई डोफेकर, अश्विनी तहकिक, आशिष दहातोंडे, सुनिता कोठाळे अशा आठ जणांनी अर्ज भरले होते. यापैकी चार जणांनी माघार घेतल्याने मापारी, सरनाईक, देशमुख व ठाकरे यांच्यात लढत झाली. सर्वाधिक ३५ मते वैभव सरनाईक यांना तर सुरेश मापारी यांना ३४ मते मिळाल्याने या दोघांनाही विजयी घोषित करण्यात आले. संध्या देशमुख (१८) व उमेश ठाकरे (१७) यांचा पराभव झाला.

टॅग्स :washimवाशिम