शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 16:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : जिल्ह्यात जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असताना वारंवार तारखेत बदल ...

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असताना वारंवार तारखेत बदल करूनही ही प्रक्रिया प्रलंबित राहत आहे. या संदर्भात लोकमतने २३ आॅगस्टच्या अंकात ‘जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याच दखल घेऊन आता तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी  ४ सप्टेंबर रोजी नव्याने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तीन ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन येत्या ११ सप्टेंबरला, तर उर्वरित ३ ग्रामपंचायतींचे १३ सप्टेंबरला करण्याचे ठरले आहे. वाशिम जिल्ह्यात २०१८-१९ अंतर्गत मानोरा तालुक्यातील गिरोली, कारंजा तालुक्यातील विळेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, वाशिम तालुक्यातील काटा, रिसोड तालुक्यातील बिबखेडा आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा या ग्रामपंचायतींची तालुकास्मार्ट ग्राम म्हणून निवड झाली.  या ग्रामपंचायतींचे पुर्नमुल्यांकन करून जिल्हा स्मार्ट ग्राम निवडण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्मार्ट ग्राम तपासणी समिती अध्यक्षांनी जिल्हा तपासणी समितीच्या सदस्यांना सुचित केले. त्यात ३१ मे रोजी पूर्व नियोजित तपासणीची तारिख बदलून सहा ग्रामपंचायतींसाठी गिरोली आणि विळेगावसाठी १ जुन, सायखेडा, काटासाठी ४ जून, तर बिबखेडा आणि ढोरखेडासाठी ६ जून २०१९ ची तारिख निश्चित करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतींनी तयारीही केली; परंतु या तारखेत ७ आॅगस्ट रोजी बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा ११ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी  १२ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. त्यापूर्वीच ९ आॅगस्ट रोजी पुन्हा तारखेत बदल करून  गिरोली, विळेगाव आणि सायखेडा १३ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १४ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेलाही पुनर्मुल्यांकन करण्यात आले नाही. वारंवार तारखेत बदल होत असल्याने स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. या संदर्भात लोकमतने २३ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत आता सहा तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींपैकी गिरोली, विळेगाव आणि सायखेडा या तीन ग्रामपंचायतींसाठी ११ सप्टेंबर, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी  १३ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता या तारखेला स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन होते की, पुन्हा तारखेत बदल होतो, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :washimवाशिम