शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:55 IST

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली. 

ठळक मुद्देचाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले.

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली.  तब्बल १ कोटी ३४ लाख रुपये खर्च असलेल्या या योजनेमुळे मालेगावकरांची पाणीटंचाईची समस्या मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.  

मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान मोठे प्रकल्प आहेत. तथापि, चाकातिर्थ वगळता उन्हाळ्याच्या दिवसांत इतर प्रकल्प तळ गाठतात; परंतु चाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मंत्रालय स्तरावर त्या प्रस्तावाला १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि या योजनेच्या कामासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मालेगाव शहरात असलेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता या योजनेचे काम युद्धपातळीवर होण्याची मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत होती. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मिनाक्षी सावंत, बबनराव चोपडे, तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती रामदास बळी, गजानन सारस्कर, रेखा अरुण बळी, अफसाना तस्लिम, अमोल सोनोने, उमेश खुळे, शशिकांत टनमने, तस्लिम सय्यद, किशोर महाकाळ, संतोष सुरडकर, संतोष जोशी, चंदू जाधव, डॉ. निलेश मानधने, संतोष बनसोड, प्रमोद हरने, मनोज सरदार आदि सर्व नगरपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

 

चाकातीर्थ ते कुरळा तातडीच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरात मिळाली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आज काम सुरु करण्यात आले आहे. १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव