शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:55 IST

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली. 

ठळक मुद्देचाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले.

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली.  तब्बल १ कोटी ३४ लाख रुपये खर्च असलेल्या या योजनेमुळे मालेगावकरांची पाणीटंचाईची समस्या मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.  

मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान मोठे प्रकल्प आहेत. तथापि, चाकातिर्थ वगळता उन्हाळ्याच्या दिवसांत इतर प्रकल्प तळ गाठतात; परंतु चाकातिर्थ प्रकल्पातील पाणीसुद्धा आरक्षित असल्याने आणि प्रशासकीय मान्यता नसल्याने मालेगावकरांना त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पातून कुरळाधरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मंत्रालय स्तरावर त्या प्रस्तावाला १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि या योजनेच्या कामासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मालेगाव शहरात असलेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता या योजनेचे काम युद्धपातळीवर होण्याची मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत होती. अखेर सर्व प्रशासकीय कार्यवाही पार पडल्यानंतर ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मिनाक्षी सावंत, बबनराव चोपडे, तहसीलदार राजेश वजिरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती रामदास बळी, गजानन सारस्कर, रेखा अरुण बळी, अफसाना तस्लिम, अमोल सोनोने, उमेश खुळे, शशिकांत टनमने, तस्लिम सय्यद, किशोर महाकाळ, संतोष सुरडकर, संतोष जोशी, चंदू जाधव, डॉ. निलेश मानधने, संतोष बनसोड, प्रमोद हरने, मनोज सरदार आदि सर्व नगरपंचायत सदस्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

 

चाकातीर्थ ते कुरळा तातडीच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाची मंजुरात मिळाली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आज काम सुरु करण्यात आले आहे. १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव