शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

संसर्ग टाळण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’; २० हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:15 IST

सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाऱ्या या रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्याने संभाव्य संसर्ग टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर जिल्हा प्रशासनाने ‘फिव्हर क्लिनिक’ची सुविधा उपलब्ध केली असून, या क्लिनिकमध्ये ४ जुलैपर्यंत जवळपास २० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाऱ्या या रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्याने संभाव्य संसर्ग टळला.संसर्गजन्य आजाराला वेळीच आवर घालणे, नागरिकांपर्यंत इत्यंभूत माहिती पोहचवून कोणती दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी ६ जुलै रोजी जागतिक संसर्ग निवारण दिन साजरा करण्यात येतो. संसर्गजन्य आजारात एकूण तीन प्रकारचे आजार असून, यामध्ये किटकजन्य, हवेद्वारे पसरणारे आणि पाण्याद्वारे पसरणारे आजाराचा समावेश आहे. किटकजन्य आजारात तीव्र मेंदुज्वर, हिवताप, चिकुनगुन्या, डेंग्यू आदींचा समावेश आहे. हवेद्वारे पसरणाºया आजारात स्वाईन फ्लू, क्षयरोग, डांग्या खोकला, गोवर आदीचा समावेश आहे. दूषित पाण्याद्वारे तीव्र अतिसार व तत्सम आजार, कॉलरा, काविळ अ आणि एपोलिओ आदी आजार उद्भवतात. वाशिम जिल्ह्याचा विचार करता, हिवताप, डेंग्यू, क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, गोवर, अतिसार, काविट अ आणि ए आदी संसर्गजन्य आजार उद्भवतात. गतवर्षी स्वाईन फ्ल्यूचे सहा ते सात रुग्ण आढळले होते. चालू वर्षात तर कोरोना विषाणू संसर्गामुळे अन्य संसर्गजन्य आजारी रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. क्षयरोगाचे सध्या ५८६ रुग्ण असून, या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहे. क्षयरुग्ण तपासणीसाठी अत्याधुनिक मशिन्स् जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध असल्याने संसर्ग टाळण्याच्या दृष्टिने ती मोठी उपलब्धी आहे.दरम्यान, सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विशेष खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुकास्तरावर फिव्हर क्लिनिकची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोनापूर्वीची लक्षणे ही सर्दी, ताप, खोकला आदी प्रकारातील असल्याने या क्लिनिकमध्ये केवळ सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे असणाºया जवळपास २० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांना वेळीच उपचार मिळाले. दुसरीकडे परगावावरून परतलेल्या ७० हजार नागरिकांमुळे कोणत्याही संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयांमध्ये ३ जुलैपर्यंत केली आहे. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, नागरिकांनीदेखील स्वत: सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांनी केले.  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या जात आहे. बाहेरगावावरून परतणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू केले.- ऋषिकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या