शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘लॉकडाऊन’ काळात भागविली मोकाट श्वानांची भूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:45 IST

सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या ४५ दिवसांपासून सर्वत्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लागलेला आहे. या काळात रस्त्यांवरील नाश्ता विक्रीच्या हातगाड्या, हॉटेल्स, रेस्टॉरंटही बंद असल्याने उष्टावळीवर जगणाऱ्या मोकाट श्वानांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर २५ मार्चपासून संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लावण्यात आलेला आहे. तिसºया टप्प्यात ‘लॉकडाऊन’ १७ मे पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्वच ठिकाणचे कामधंदे ठप्प पडल्याने हातावर पोट असणाºया गोरगरिबांच्या कुटूंबात दोनवेळच्या जेवणाचे वांधे झाले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत वाशिममध्ये राजाभैया मित्रमंडळाच्या सदस्यांनी सामाजिक संवेदना जपत अन्नदानाचे कार्य हाती घेतले. भुकेल्या गोरगरिबांसोबतच रस्त्यावर फिरणाºया मोकाट श्वानांचेही पोट भरण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यानुसार, रोज रात्रीच्या सुमारास वाशिम शहरातीलर स्त्यांवर फिरून राजाभैया पवार, सुशील भिमजीयाणी, महादेव हरकळ, विक्रम बबेरवाल ही मंडळी ब्रेड, भात, बिस्कीट, पोळी याव्दारे श्वानांची भूक शमविण्याचा प्रयत्न करित आहेत. विशेषत: या सामाजिक कार्यात काही पोलिस अधिकाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला आहे.‘ग्रीन झोन’मध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्याला ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता मिळाली असून दुपारी दोन वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा मिळाली; मात्र हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासंबंधी अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे रस्त्यांवर फिरणाºया मोकाट गायी, श्वानांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अशा स्थितीत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रोज रात्रीच्या सुमारास मोकाट जनावरांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारली. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिम