शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांच्या नशिबी केवळ संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:02 IST

Corona warriors, Washim अद्याप कोरोनायोद्धा यांच्या कुटुंबियांना विमा कवचाची रक्कम मिळाली नाही.

वाशिम : कोरोनाकाळात कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत जिल्ह्यातील पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणारी मदत अद्याप मिळाली नाही. कोरोनायोद्धा यांनी कोरोनाशी लढा दिला; आता त्यांच्या कुटुंबियांवर मदतीसाठी जणू लढा देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांची अंमलबजावणी शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोविड-१९ च्या कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाºयाच्या कुटुंबियांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यात कोरोनाशी लढताना आतापर्यंत पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पाच जणांचे प्रस्ताव तालुकास्तरावरून जिल्हा प्रशासन आणि जिल्हास्तरावरून शासनाकडे तातडीने जाणे अपेक्षीत आहे. परंतू, अद्याप कोरोनायोद्धा यांच्या कुटुंबियांना विमा कवचाची रक्कम मिळाली नाही. साधे सांत्वनही झाले नसल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली.

माझे पती राजेश निमकंडे हे कोरोनाकाळात जनतेची सेवा करताना जग सोडून गेले. त्यांच्या सेवेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे; परंतु या संदर्भात शासनाकडून कोणत्याही प्रकारची विचारणा झाली नाही ही खंत असून, अद्याप कुठली मदतही मिळाली नाही.-वनिता राजेश निमकंडे, अकोलाराजेश यांच्या पत्नीमाझी पत्नी कांचन मलिकचे नगर परिषदेंतर्गत जनतेची सेवा करताना कोरोना संसर्गामुळेच ३ सप्टेंबरला निधन झाले. तिने जिवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्याचा विचार केला. तिच्या या कार्याचा मला अभिमान आहे; महिना उलटला तरी आर्थिक मदत नाही; शिवाय साधे सांत्वनही करण्यात आले नाही.

- नटवर परशराम मलिक, कांचन यांचे पतीमाझे वडिल मानोरा पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. जनतेची सेवा करताना कोरोना संसर्गामुळे त्यांचे १० सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांनी स्वत:ची पर्वा न करता जनसेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमानच आहे; परंतु प्रशासन, शासनाकडून साधी चौकशीही नाही. याचे मोठे दु:ख वाटते.

-वैभव साठे, अशोक साठे यांचा मुलगा

 

कोविड-१९ कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याची घोषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यात असे किती कर्मचारी आहेत आणि त्यांच्या संबंधित यंत्रणांनी या संदर्भात प्रस्ताव सादर केले आहेत का, त्याची विस्तृत माहिती घेऊ.लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. - हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

 

 

 

 

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या