शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:28 IST

शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककार्ली : नाफेडकडे नोंदणी केल्यानंतर तूर विक्री न झालेल्या शेतकºयांना एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तत्कालिन सरकारने केली होती. गत दोन वर्षापासून कार्ली परिसरातील शेकडो शेतकºयांना अद्याप सदर अनुदान मिळाले नाही.सन २०१८ च्या खरीप हंगामातील तुर पिकाकरिता नाफेडअंतर्गत शेतमालाला आधारभूत किंमतीप्रमाणे रास्त भाव मिळण्यासाठी तुर खरेदी केंद्र  सुरू केले होते. शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही. शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत शेतमाल खरेदी न झालेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल १ हजार प्रमाणे अनुदान देण्याचे शासनाचे जाहिर केले होते. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात अन्यत्र झाली आहे. कार्ली परिसरातील शेकडो शेतकºयांना अद्याप अनुदान मिळाले नाही. बँकेत जावुन बँक खात्यात अनुदान जमा झाले का,  हे पाहण्यासाठी अनेक शेतकरी चकरा मारत असल्याचे दिसून येते. नवीन सरकारने तरी तूर अनुदानाचे पैसे द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. अगोदरच नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कधी पावसाचा अनियमितपणा तर कधी अवकाळी पाऊस व गारपिट यामुळे शेतकºयांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनुदानाचेही पैसे मिळत नसल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढत आहे. दोन वर्षानंतरही अनुदान मिळत नसल्याने प्रशासकीय दिरंगाई समोर येत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, टाळाटाळ केली जाते, असा आरोपही कार्ली परिसरातील शेतकºयांनी केला. माझ्या शेतातील तुर या शेतमालाची हमीभावाने विक्री व्हावी म्हणून नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी सन २०१८ ला केली होती. मात्र दोन वर्र्षे लोटली तरी अद्याप अनुदानाचा पत्ता नाही. याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारमध्येही तक्रार केली होती. त्यावर लवकर निर्णय घेण्याचे कबुल करणाºया  अधिकाºयांना अजुनही याबाबत वेळ मिळाला नाही. संबंधित अधिकारी हे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या समक्ष वेळ मारुन नेतात, ते आमच्या सारख्या शेतकºयाना काय वेळ देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-व्दारकाबाई घमराव देशमुख,रा. कार्ली ता.जि.वाशिम

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र