शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

‘फळ पीक विमा’कडे शेतक-यांची पाठ!

By admin | Updated: June 19, 2017 04:20 IST

जनजागृतीचा अभाव; केवळ ७३ संत्रा उत्पादकांनी उतरविला विमा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा आणि डाळिंब या फळ पिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली जात आहे; मात्र प्रभावी जनजागृतीचा अभाव असल्याने संत्रा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ जून असताना तोपर्यंंंत केवळ ७३ संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनीच विमा उतरविल्याची माहिती सूत्रांनी दिली.संत्रा फळ पिकाकरिता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डी आसरा व राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहागीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस आणि मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलू खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलूबाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी व कुपटा, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कारंजा, कामरगाव, धनज बु., पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे आणि येवता या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर ७0 हजार रुपये ठेवण्यात आली होती; तर एकूण विमा हप्ता १८ हजार ८४४ रुपये आहे. त्यापैकी शेतकर्‍यांना केवळ ३ हजार ५00 रुपये रक्कम भरावयाची होती; परंतु खरिपाच्या पेरणीत व्यस्त असलेल्या अनेक शेतकर्‍यांची तूर विकणे बाकी असून, ज्यांची तूर विकल्या गेली, त्यांना नाफेडकडून अद्याप चुकारे मिळाले नाहीत. सोयाबीनलाही अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती रोख पैसा शिल्लक नसल्याने ३ हजार ५00 रुपये विमा रक्कम भरणेदेखील कठीण जात असल्याने शेतकर्‍यांनी विमा योजनेकडे चक्क पाठ फिरवली आहे. १४ जून या अंतिम मुदतीपर्यंंंत ७३ शेतकरी संत्रा फळ पीक विमा योजनेत सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.