शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

‘फळ पीक विमा’कडे शेतक-यांची पाठ!

By admin | Updated: June 19, 2017 04:20 IST

जनजागृतीचा अभाव; केवळ ७३ संत्रा उत्पादकांनी उतरविला विमा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा आणि डाळिंब या फळ पिकांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली जात आहे; मात्र प्रभावी जनजागृतीचा अभाव असल्याने संत्रा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ जून असताना तोपर्यंंंत केवळ ७३ संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनीच विमा उतरविल्याची माहिती सूत्रांनी दिली.संत्रा फळ पिकाकरिता वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डी आसरा व राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहागीर व रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस आणि मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, शेलू खु., पोटी, कवठळ, धानोरा, शेलूबाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी व कुपटा, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, कारंजा, कामरगाव, धनज बु., पोहा, खेर्डा बु., हिवरा लाहे आणि येवता या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर ७0 हजार रुपये ठेवण्यात आली होती; तर एकूण विमा हप्ता १८ हजार ८४४ रुपये आहे. त्यापैकी शेतकर्‍यांना केवळ ३ हजार ५00 रुपये रक्कम भरावयाची होती; परंतु खरिपाच्या पेरणीत व्यस्त असलेल्या अनेक शेतकर्‍यांची तूर विकणे बाकी असून, ज्यांची तूर विकल्या गेली, त्यांना नाफेडकडून अद्याप चुकारे मिळाले नाहीत. सोयाबीनलाही अपेक्षित दर मिळणे दुरापास्त झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती रोख पैसा शिल्लक नसल्याने ३ हजार ५00 रुपये विमा रक्कम भरणेदेखील कठीण जात असल्याने शेतकर्‍यांनी विमा योजनेकडे चक्क पाठ फिरवली आहे. १४ जून या अंतिम मुदतीपर्यंंंत ७३ शेतकरी संत्रा फळ पीक विमा योजनेत सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.