शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध!

By admin | Updated: June 1, 2017 01:15 IST

काम बंद ठेवण्याची मागणी : रस्त्याचे काम निकृष्ट

लोेकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन : किन्ही घोडमोड मार्गे पर्यायी म्हणून केला जाणारा रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून, रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली.२००५ -०६ पासून मंजुरात असलेल्या मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला मागील दोन महिन्यांपासून गती मिळाली आहे. सदर काम थंड बस्त्यात असताना लोकमतने पाठपुरावा करून सदर कामे त्वरित होण्यासाठी पुढाकार घेतला होता. याची दखल अधिकाऱ्यांनी घेऊन कामाला गती दिली होती. सद्यस्थितीत पांगरखेडा ते चांडस गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम जोरात सुरू आहे; मात्र बुडीत क्षेत्रात गेलेल्या शिरपूर मिर्झापूर रस्त्याला पर्याय म्हणून किन्ही घोडमोड मार्गे केलेला पर्यायी रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविल्या जात आहे. सदर होत असलेल्या कामाच्या निषेधार्थ ३० मे पासून मिर्झापूर, घाटावासीयांनी प्रकल्पाच्या कामाला विरोध करून काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. ३१ मे रोजीसुद्धा सदर कामावर जावून ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे शिरपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात कॅनॉलचे खोदकाम पाच ते सात वर्षांपासून करण्यात आले; परंतु त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. मोबदला त्वरित देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.‘त्या’नंतरच कामास सुरुवात करण्याची मागणी२००५-०६ मध्ये मिर्झापूर लघु प्रकल्पाला मंजुरात मिळून २००९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यासाठी २१० हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आली. या शिरपूर मिर्झापूर रस्त्याचा काही भाग प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात समाविष्ट होणाार असल्याने मिर्झापूर घाटावासीयांनी पर्यायी रस्त्याची मागणी केली. याकडे तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. पर्यायी रस्त्यासाठी त्यावेळी दोन्ही गावाच्या नागरिकांनी आमरण उपोषणही केले होते. त्याची दखल घेऊन दोन वर्षापूर्वी मिर्झापूर-किन्ही घोडमोड हा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला; परंतु हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने समोरासमोर दोन वाहने आले की वाहन काढणे शक्य नसल्याने व केलेले रस्त्याचे काम अतिशय थातूरमातूर असल्याने व संथ गतिने सुरु केलेल्या प्रकल्पाच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच ते काम थांबविले आहे. रस्ता चांगला व मोठा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत असून, त्यानंतरच कामास सुरुवात करण्याची मागणी होत आहे.