शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 15:33 IST

शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.

- माणिक डेरेलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील अनेक गावांमधील शेती ही वनक्षेत्राला लागून आहे. यामुळे शेतांमधील पिकांना वन्यप्राण्यांचा धोका कायमचाच लागून असतो. वनविभाग मात्र याबाबत मूग गिळून गप्प असल्याने शेतकऱ्यांनाच पिकांच्या रक्षणासाठी शेतांमध्ये बाराही महिने ‘जागल’साठी जावे लागते. त्याकरिता शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.मानोरा तालुक्यातील विठोली, बेलोरा, हातना, भुली, पोहरादेवी, आमदरी, सावरगांव, मेंद्रा, वटफळ यासह इतरही अनेक गावांमधील शेतकऱ्यांची शेती वनक्षेत्रालगत वसलेली आहे. त्यावर खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध स्वरूपातील पिकांची पेरणी करण्यात येते; परंतु लागवडीपासूनच रानडुक्कर, रोही, हरीण, वानर आदी वन्यप्राण्यांचा त्रास सुरू होत असल्याने पिके संकटात सापडतात. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभागाचे कुठलेच अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतांमध्ये उभारलेल्या झोपड्यांमध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतुंमध्ये रात्रीलाही झोपायला जावून तथा जीव धोक्यात घालून दोन्ही हंगामातील पिकांचे रक्षण स्वत:च करावे लागत असून त्यास वनविभागाचा अकार्यक्षमपणा आणि बेजबाबदार वृत्ती कारणीभूत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नैसर्गिक संकटांमुळे पोहरादेवी परिसरातील शेतकरी आधीच जेरीस आलेला आहे. त्यातच वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे वन्यप्राण्यांपासूनही शेतीपिकांचे नित्यनेम नुकसान होत आहे. असे असताना गत दोन वर्षात वनविभागाकडून या भागात गस्त सुरू असल्याचे कधी दिसून आले नाही, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज राठोड यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा