शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 15:33 IST

शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.

- माणिक डेरेलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील अनेक गावांमधील शेती ही वनक्षेत्राला लागून आहे. यामुळे शेतांमधील पिकांना वन्यप्राण्यांचा धोका कायमचाच लागून असतो. वनविभाग मात्र याबाबत मूग गिळून गप्प असल्याने शेतकऱ्यांनाच पिकांच्या रक्षणासाठी शेतांमध्ये बाराही महिने ‘जागल’साठी जावे लागते. त्याकरिता शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.मानोरा तालुक्यातील विठोली, बेलोरा, हातना, भुली, पोहरादेवी, आमदरी, सावरगांव, मेंद्रा, वटफळ यासह इतरही अनेक गावांमधील शेतकऱ्यांची शेती वनक्षेत्रालगत वसलेली आहे. त्यावर खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध स्वरूपातील पिकांची पेरणी करण्यात येते; परंतु लागवडीपासूनच रानडुक्कर, रोही, हरीण, वानर आदी वन्यप्राण्यांचा त्रास सुरू होत असल्याने पिके संकटात सापडतात. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभागाचे कुठलेच अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतांमध्ये उभारलेल्या झोपड्यांमध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतुंमध्ये रात्रीलाही झोपायला जावून तथा जीव धोक्यात घालून दोन्ही हंगामातील पिकांचे रक्षण स्वत:च करावे लागत असून त्यास वनविभागाचा अकार्यक्षमपणा आणि बेजबाबदार वृत्ती कारणीभूत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नैसर्गिक संकटांमुळे पोहरादेवी परिसरातील शेतकरी आधीच जेरीस आलेला आहे. त्यातच वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे वन्यप्राण्यांपासूनही शेतीपिकांचे नित्यनेम नुकसान होत आहे. असे असताना गत दोन वर्षात वनविभागाकडून या भागात गस्त सुरू असल्याचे कधी दिसून आले नाही, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज राठोड यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा