शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 15:33 IST

शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.

- माणिक डेरेलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील अनेक गावांमधील शेती ही वनक्षेत्राला लागून आहे. यामुळे शेतांमधील पिकांना वन्यप्राण्यांचा धोका कायमचाच लागून असतो. वनविभाग मात्र याबाबत मूग गिळून गप्प असल्याने शेतकऱ्यांनाच पिकांच्या रक्षणासाठी शेतांमध्ये बाराही महिने ‘जागल’साठी जावे लागते. त्याकरिता शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते.मानोरा तालुक्यातील विठोली, बेलोरा, हातना, भुली, पोहरादेवी, आमदरी, सावरगांव, मेंद्रा, वटफळ यासह इतरही अनेक गावांमधील शेतकऱ्यांची शेती वनक्षेत्रालगत वसलेली आहे. त्यावर खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात विविध स्वरूपातील पिकांची पेरणी करण्यात येते; परंतु लागवडीपासूनच रानडुक्कर, रोही, हरीण, वानर आदी वन्यप्राण्यांचा त्रास सुरू होत असल्याने पिके संकटात सापडतात. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभागाचे कुठलेच अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतांमध्ये उभारलेल्या झोपड्यांमध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतुंमध्ये रात्रीलाही झोपायला जावून तथा जीव धोक्यात घालून दोन्ही हंगामातील पिकांचे रक्षण स्वत:च करावे लागत असून त्यास वनविभागाचा अकार्यक्षमपणा आणि बेजबाबदार वृत्ती कारणीभूत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.नैसर्गिक संकटांमुळे पोहरादेवी परिसरातील शेतकरी आधीच जेरीस आलेला आहे. त्यातच वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे वन्यप्राण्यांपासूनही शेतीपिकांचे नित्यनेम नुकसान होत आहे. असे असताना गत दोन वर्षात वनविभागाकडून या भागात गस्त सुरू असल्याचे कधी दिसून आले नाही, अशी माहिती पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज राठोड यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा