शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर तूर संगोपनावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:26 IST

शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या संगोपनाकडेच शेतकºयांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

वाशिम : सिंचनासाठी पुरेसे पाणी आणि अखंडीत वीज या दोन्ही सुविधा मिळणे दुरापास्त झाल्याने यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभºयाच्या पेºयात बहुतांशी घट झाली आहे. त्याऐवजी शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या संगोपनाकडेच शेतकºयांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.दरवर्षीच्या रब्बी हंगामात अमरावती विभागातील वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ६ लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा यासह अन्य पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून केले जाते. त्यानुसार, यंदाही नियोजन करण्यात आले; परंतु पेरणीची वेळ उलटून गेल्यानंतरही २६ नोव्हेंबरपर्यंत अधिकांश शेतकºयांनी अद्याप पेरणीच केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, महावितरणकडून कुठलेही ठोस वेळापत्रक तयार न करता कृषीपंपांना अवेळी केला जाणारा वीज पुरवठा, शेतशिवारांमध्ये संरक्षित ओलीताची सोय नसणे, सिंचन प्रकल्पांच्या नादुरूस्त कालव्यांमधून पिकांसाठी पाणी न मिळणे यासह रानडुक्कर, हरीण, रोही आदी वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान आदी बिकट समस्यांमुळे बहुतांश शेतकºयांनी गहू आणि हरभरा या पिकांच्या पेरणीकडे पाठ फिरवून केवळ तूर संगोपनाकडेच लक्ष केंद्रीत केल्याचे पाहावयास मिळत आहे. 

वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारणत: ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जाते. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शेतात तूर उभी असल्यानेच अनेक शेतकºयांनी पेरणी केलेली नाही.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती