शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या दिवशी पीक विम्यासाठी शेतक-यांची ‘झुंबड’

By admin | Updated: August 1, 2015 00:02 IST

शेतक-यांचा पीक विमा काढण्याकडे कल; तलाठी, कृषी सहाय्यकाची अनुपस्थिती ठरली डोकेदुखी.

वाशिम :शासनाच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या खरिप हंगाम २0१५ राष्ट्रीय कृषी विमा योजनेसाठी ३१ जुलै शेवटच्या दिवशी शेतकर्‍यांनी एकच झुंबड केली होती. जिल्हयात शेवटच्या दिवशी शेकडो शेतकर्‍यांनी पीक विमा काढला. अनेक गावात अर्ज भरुन देण्यासाठी तलाठी उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांना त्यांच्या शोधासाठी वणवण भटकावे लागले. २0१0 ते २0१२ या वर्षात शेतकर्‍यांचा पीक विमाकडे कल अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गत दोन वर्षांपासून होणारे नुकसान पाहता गतवर्षीपासून यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल असून २0१३ मध्ये १ लाख १६ हजार शेतकर्‍यांना ५७ कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ झाला आहे. विदर्भातील सहाही आत्महत्याग्रस्त जिल्हयात पीक विमा योजनेच्या हप्त्यात ५0 टक्के सुट दिली असल्याने प्रत्येक शेतकर्‍याने पीक विमा काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हयात ८0 ते ८५ टक्के शेतकर्‍यांनी पीक विमा काढल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. कारंजा शहरात पिक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जवळपास ३ हजार ९00 शेतकर्‍यांनी पिकविम्याची अर्ज केल्याचे शहरातील बँकांमधून घेतलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. मानोरा तालुक्यात जवळपास १६ हजार शेतकर्‍यांनी पिक विम्यासाठी अर्ज केल्याचे कृषी अधिकारी कार्यालय, तसेच विविध बँकतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रिसोड तालुक्यातील १0 पेैकी ८ बँकेतील शाखेमध्ये आजपर्यंत १३ हजार ९१४ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला. यामध्ये हराळ, रिठद, वाकद, चिखली, मांगुळ झनक, मोप, रिसोड व केनवडचा समावेश आहे.