शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
3
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
4
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
5
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
6
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
7
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
8
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
9
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
10
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
11
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
12
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
13
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
14
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
15
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
16
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
17
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
18
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
19
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
20
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

शेवटच्या दिवशी पीक विम्यासाठी शेतक-यांची ‘झुंबड’

By admin | Updated: August 1, 2015 00:02 IST

शेतक-यांचा पीक विमा काढण्याकडे कल; तलाठी, कृषी सहाय्यकाची अनुपस्थिती ठरली डोकेदुखी.

वाशिम :शासनाच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या खरिप हंगाम २0१५ राष्ट्रीय कृषी विमा योजनेसाठी ३१ जुलै शेवटच्या दिवशी शेतकर्‍यांनी एकच झुंबड केली होती. जिल्हयात शेवटच्या दिवशी शेकडो शेतकर्‍यांनी पीक विमा काढला. अनेक गावात अर्ज भरुन देण्यासाठी तलाठी उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांना त्यांच्या शोधासाठी वणवण भटकावे लागले. २0१0 ते २0१२ या वर्षात शेतकर्‍यांचा पीक विमाकडे कल अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गत दोन वर्षांपासून होणारे नुकसान पाहता गतवर्षीपासून यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल असून २0१३ मध्ये १ लाख १६ हजार शेतकर्‍यांना ५७ कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ झाला आहे. विदर्भातील सहाही आत्महत्याग्रस्त जिल्हयात पीक विमा योजनेच्या हप्त्यात ५0 टक्के सुट दिली असल्याने प्रत्येक शेतकर्‍याने पीक विमा काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हयात ८0 ते ८५ टक्के शेतकर्‍यांनी पीक विमा काढल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. कारंजा शहरात पिक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जवळपास ३ हजार ९00 शेतकर्‍यांनी पिकविम्याची अर्ज केल्याचे शहरातील बँकांमधून घेतलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. मानोरा तालुक्यात जवळपास १६ हजार शेतकर्‍यांनी पिक विम्यासाठी अर्ज केल्याचे कृषी अधिकारी कार्यालय, तसेच विविध बँकतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रिसोड तालुक्यातील १0 पेैकी ८ बँकेतील शाखेमध्ये आजपर्यंत १३ हजार ९१४ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला. यामध्ये हराळ, रिठद, वाकद, चिखली, मांगुळ झनक, मोप, रिसोड व केनवडचा समावेश आहे.