शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेवटच्या दिवशी पीक विम्यासाठी शेतक-यांची ‘झुंबड’

By admin | Updated: August 1, 2015 00:02 IST

शेतक-यांचा पीक विमा काढण्याकडे कल; तलाठी, कृषी सहाय्यकाची अनुपस्थिती ठरली डोकेदुखी.

वाशिम :शासनाच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या खरिप हंगाम २0१५ राष्ट्रीय कृषी विमा योजनेसाठी ३१ जुलै शेवटच्या दिवशी शेतकर्‍यांनी एकच झुंबड केली होती. जिल्हयात शेवटच्या दिवशी शेकडो शेतकर्‍यांनी पीक विमा काढला. अनेक गावात अर्ज भरुन देण्यासाठी तलाठी उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांना त्यांच्या शोधासाठी वणवण भटकावे लागले. २0१0 ते २0१२ या वर्षात शेतकर्‍यांचा पीक विमाकडे कल अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गत दोन वर्षांपासून होणारे नुकसान पाहता गतवर्षीपासून यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल असून २0१३ मध्ये १ लाख १६ हजार शेतकर्‍यांना ५७ कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ झाला आहे. विदर्भातील सहाही आत्महत्याग्रस्त जिल्हयात पीक विमा योजनेच्या हप्त्यात ५0 टक्के सुट दिली असल्याने प्रत्येक शेतकर्‍याने पीक विमा काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हयात ८0 ते ८५ टक्के शेतकर्‍यांनी पीक विमा काढल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. कारंजा शहरात पिक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जवळपास ३ हजार ९00 शेतकर्‍यांनी पिकविम्याची अर्ज केल्याचे शहरातील बँकांमधून घेतलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. मानोरा तालुक्यात जवळपास १६ हजार शेतकर्‍यांनी पिक विम्यासाठी अर्ज केल्याचे कृषी अधिकारी कार्यालय, तसेच विविध बँकतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रिसोड तालुक्यातील १0 पेैकी ८ बँकेतील शाखेमध्ये आजपर्यंत १३ हजार ९१४ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला. यामध्ये हराळ, रिठद, वाकद, चिखली, मांगुळ झनक, मोप, रिसोड व केनवडचा समावेश आहे.