शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

हरभऱ्याच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 15:43 IST

पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऐन रब्बीच्या हंगामात महावितरणने वारेमाप भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण होणार आहे. अशात अधिक पाण्याची गरज असलेल्या गहू पिकाची पेरणी करणे धोक्याचे ठरू शकणार आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.यंदाच्या रब्बी हंगामासाठी पश्चिम वºहाडातील शेतकºयांकडे प्रामुख्याने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांकडे पुरेशा पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे शेतकºयांत रब्बी हंगामाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या; परंतु महावितरणने या हंगामाच्या सुरुवातीलाच भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे पाणी असतानाही सिंचन करण्यात अडचणी येणार आहेत. रब्बी हंगामातील गहू पीक दीर्घकालीन आणि पाण्याची अधिक आवश्यकता असणारे आहे, तसेच पश्चिम वºहाडातील जमिनीचा स्तर पाहता या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचीही गरज असते. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या पेरणीची जोखीम उचलण्यास तयार नाहीत. त्यामुळेच कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या हरभरा पिकाच्या पेरणीवर शेतकरी भर देत आहेत.घरच्या बियाण्यांचा वापर अधिककृषी विभागाने रब्बीच्या हंगामाची तयारी करताना अनुदानित बियाणे आणि खते शेतकºयांसाठी उपलब्ध केली आहेत; परंतु अनुदानित बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागला. हरभरा पेरणीची उत्तम वेळ निघून जात असल्याने, तसेच अनुदानित हरभरा बियाण्याचे दर हे खुल्या बाजारातील बियाण्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकरी घरच्या बियाण्यांचाच वापर अधिक करीत आहेत.

गहू पिकाला किमान ८ ते १० वेळा पाणी देणे आवश्यक असते. आता महावितरणच्या भारनियमनामुळे या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकणार नसल्याने हरभरा पिकाची पेरणी केली आहे.-दशरथ पवार, शेतकरी, मंगरुळपीर (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती