शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हरभऱ्याच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 15:43 IST

पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऐन रब्बीच्या हंगामात महावितरणने वारेमाप भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण होणार आहे. अशात अधिक पाण्याची गरज असलेल्या गहू पिकाची पेरणी करणे धोक्याचे ठरू शकणार आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.यंदाच्या रब्बी हंगामासाठी पश्चिम वºहाडातील शेतकºयांकडे प्रामुख्याने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांकडे पुरेशा पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे शेतकºयांत रब्बी हंगामाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या; परंतु महावितरणने या हंगामाच्या सुरुवातीलाच भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे पाणी असतानाही सिंचन करण्यात अडचणी येणार आहेत. रब्बी हंगामातील गहू पीक दीर्घकालीन आणि पाण्याची अधिक आवश्यकता असणारे आहे, तसेच पश्चिम वºहाडातील जमिनीचा स्तर पाहता या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचीही गरज असते. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या पेरणीची जोखीम उचलण्यास तयार नाहीत. त्यामुळेच कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या हरभरा पिकाच्या पेरणीवर शेतकरी भर देत आहेत.घरच्या बियाण्यांचा वापर अधिककृषी विभागाने रब्बीच्या हंगामाची तयारी करताना अनुदानित बियाणे आणि खते शेतकºयांसाठी उपलब्ध केली आहेत; परंतु अनुदानित बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागला. हरभरा पेरणीची उत्तम वेळ निघून जात असल्याने, तसेच अनुदानित हरभरा बियाण्याचे दर हे खुल्या बाजारातील बियाण्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकरी घरच्या बियाण्यांचाच वापर अधिक करीत आहेत.

गहू पिकाला किमान ८ ते १० वेळा पाणी देणे आवश्यक असते. आता महावितरणच्या भारनियमनामुळे या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकणार नसल्याने हरभरा पिकाची पेरणी केली आहे.-दशरथ पवार, शेतकरी, मंगरुळपीर (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती