शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आधार प्रमाणिकरणात अडकली शेतकरी कर्जमुक्ती योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:49 IST

लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ तुर्तास मिळाला नसून, नवीन पीककर्जही मिळत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत भर पडली.महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले आहेत. शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करण्याची कार्यवाही सुरू होती. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकºयांना आपले आधार प्रमाणिकरण पूर्ण करावे लागते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून आधार प्रमाणिकरण प्रक्रिया बंद करण्यात आली. तत्पूर्वी ७० हजार ९६५ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्याने या शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होउ शकले नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सध्या ही प्रक्रिया ठप्प असल्याने आणि कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने २८ हजार २५८ शेतकºयांना नवीन कर्जाची प्रतिक्षा कायम आहे. आधार प्रमाणिकरण अपूर्ण राहिलेल्या शेतकºयांनादेखील राज्य शासनाच्या निर्णयानुसार बँकांनी यंदा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. तशा सूचनाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या आहेत. तथापि, अद्याप या शेतकºयांना पीककर्ज वाटप सुरू झाले नाही. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

कर्जरक्कम जूळत नसल्यास ‘अमान्य’ पर्याय उपलब्धसंगणकाच्या स्क्रीनवर दिसणाº्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकºयांनी ‘अमान्य’ पर्यायाची निवड करून आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात संबंधित शेतकºयांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविली जाते. त्यावर जिल्हास्तरीय समिती योग्य निर्णय घेते. परंतू, लॉकडाउनमुळे ही प्रक्रियाच ठप्प असल्याने या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ कधी मिळणार हे अद्याप तरी अनिश्चित आहे.यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेचे वाशिम व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर म्हणाले की, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन असल्याने आणि खबरदारी म्हणून आधार प्रमाणिकरण बंद आहे. जिल्ह्यातील ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर या शेतकºयांनादेखील कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. आधार प्रमाणिकरण राहिलेल्या शेतकºयांनादेखील पीककर्जाचा लाभ द्यावा, अशा सूचना जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी