शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

आधार प्रमाणिकरणात अडकली शेतकरी कर्जमुक्ती योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:49 IST

लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ तुर्तास मिळाला नसून, नवीन पीककर्जही मिळत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत भर पडली.महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले आहेत. शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करण्याची कार्यवाही सुरू होती. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकºयांना आपले आधार प्रमाणिकरण पूर्ण करावे लागते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून आधार प्रमाणिकरण प्रक्रिया बंद करण्यात आली. तत्पूर्वी ७० हजार ९६५ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्याने या शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होउ शकले नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सध्या ही प्रक्रिया ठप्प असल्याने आणि कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने २८ हजार २५८ शेतकºयांना नवीन कर्जाची प्रतिक्षा कायम आहे. आधार प्रमाणिकरण अपूर्ण राहिलेल्या शेतकºयांनादेखील राज्य शासनाच्या निर्णयानुसार बँकांनी यंदा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. तशा सूचनाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या आहेत. तथापि, अद्याप या शेतकºयांना पीककर्ज वाटप सुरू झाले नाही. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

कर्जरक्कम जूळत नसल्यास ‘अमान्य’ पर्याय उपलब्धसंगणकाच्या स्क्रीनवर दिसणाº्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकºयांनी ‘अमान्य’ पर्यायाची निवड करून आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात संबंधित शेतकºयांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविली जाते. त्यावर जिल्हास्तरीय समिती योग्य निर्णय घेते. परंतू, लॉकडाउनमुळे ही प्रक्रियाच ठप्प असल्याने या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ कधी मिळणार हे अद्याप तरी अनिश्चित आहे.यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेचे वाशिम व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर म्हणाले की, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन असल्याने आणि खबरदारी म्हणून आधार प्रमाणिकरण बंद आहे. जिल्ह्यातील ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर या शेतकºयांनादेखील कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. आधार प्रमाणिकरण राहिलेल्या शेतकºयांनादेखील पीककर्जाचा लाभ द्यावा, अशा सूचना जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी