शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

आधार प्रमाणिकरणात अडकली शेतकरी कर्जमुक्ती योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:49 IST

लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ तुर्तास मिळाला नसून, नवीन पीककर्जही मिळत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत भर पडली.महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले आहेत. शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करण्याची कार्यवाही सुरू होती. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकºयांना आपले आधार प्रमाणिकरण पूर्ण करावे लागते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून आधार प्रमाणिकरण प्रक्रिया बंद करण्यात आली. तत्पूर्वी ७० हजार ९६५ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्याने या शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होउ शकले नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सध्या ही प्रक्रिया ठप्प असल्याने आणि कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने २८ हजार २५८ शेतकºयांना नवीन कर्जाची प्रतिक्षा कायम आहे. आधार प्रमाणिकरण अपूर्ण राहिलेल्या शेतकºयांनादेखील राज्य शासनाच्या निर्णयानुसार बँकांनी यंदा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. तशा सूचनाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या आहेत. तथापि, अद्याप या शेतकºयांना पीककर्ज वाटप सुरू झाले नाही. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

कर्जरक्कम जूळत नसल्यास ‘अमान्य’ पर्याय उपलब्धसंगणकाच्या स्क्रीनवर दिसणाº्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकºयांनी ‘अमान्य’ पर्यायाची निवड करून आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात संबंधित शेतकºयांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविली जाते. त्यावर जिल्हास्तरीय समिती योग्य निर्णय घेते. परंतू, लॉकडाउनमुळे ही प्रक्रियाच ठप्प असल्याने या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ कधी मिळणार हे अद्याप तरी अनिश्चित आहे.यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेचे वाशिम व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर म्हणाले की, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन असल्याने आणि खबरदारी म्हणून आधार प्रमाणिकरण बंद आहे. जिल्ह्यातील ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर या शेतकºयांनादेखील कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. आधार प्रमाणिकरण राहिलेल्या शेतकºयांनादेखील पीककर्जाचा लाभ द्यावा, अशा सूचना जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी