शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

शेतक-यांनो, इथेनॉल निर्मितीची शेती करा!

By admin | Updated: April 5, 2016 01:42 IST

नितीन गडकरी यांचे आवाहन; पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्याचा प्रस्ताव.

वाशिम: बदलत्या काळानुसार शेतकर्‍यांनी शेती करण्याच्या पद्धतीतही बदल केला पाहिजे. आताच्या काळात गहू, तांदूळ, ज्वारी लावून फारसा उपयोग नाही तर अधिकाधिक उत्पादनासाठी शेतीमधील विविध टाकाऊ मालापासून सेकंड जनरेशन इथेनॉलची निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी स्थानिक रिसोड नाक्याजवळ आयोजित वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचे कोनशिला अनावरणप्रसंगी केले. निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकर्‍यांसमोर नानाविध संकटे उभी राहत आहेत. शेतकर्‍यांनी आता शेती व बाजारपेठेचा अभ्यास करून अधिकाधिक उत्पादन देणार्‍या शेतमालाकडे वळले पाहिजे. शेतातील तुराट्या, पर्‍हाट्या, ऊसाचे चिपाड, आदी टाकाऊ मालापासून सेकंड जनरेशन इथेनॉलची निर्मिती होते. सध्या पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉलचा वापर केला जातो. यापुढे १0 टक्के वापर करण्याचे प्रस्तावित केले जाणार आहे. त्यामुळे इथेनॉलची मागणी वाढेल. इथेनॉलचा वापर करून नागपुरात १00 एअर कंडिशनर बसेस धावत आहेत. या सेकंड जनरेशन इथेनॉलपासून ह्यबायो-प्लास्टिकह्णची निर्मिती केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योग निर्मिती करून रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे ना. गडकरी म्हणाले. शेतकर्‍यांनी इथेनॉलची शेती करावी, असा सल्लाही गडकरी यांनी दिला. सर्व महामार्गांवर प्रत्येक ५0 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप, हॉटेलसह तेथील स्थानिक शेतीमालाची विक्री केंद्र उभारून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक १00 किलोमीटर अंतरावर ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जात असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी ना. गडकरी यांनी वाशिम जिल्ह्याला खूप काही भरभरून दिल्याचे सांगितले. वाशिम जिल्ह्यातील सिंचन अनुशेष, पुणे-मुंबईप्रमाणे मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग यासह अन्य प्रश्नही मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव, राजीव सातव, आमदार लखन मलिक, तानाजी मुटकुळे यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजय जाधव, पुरूषोत्तम राजगुरू, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्यासह भाजपा-सेना पदाधिकारी व जनसमुदायाची उपस्थिती होती.