शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

शेतक-यांनो, इथेनॉल निर्मितीची शेती करा!

By admin | Updated: April 5, 2016 01:42 IST

नितीन गडकरी यांचे आवाहन; पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्याचा प्रस्ताव.

वाशिम: बदलत्या काळानुसार शेतकर्‍यांनी शेती करण्याच्या पद्धतीतही बदल केला पाहिजे. आताच्या काळात गहू, तांदूळ, ज्वारी लावून फारसा उपयोग नाही तर अधिकाधिक उत्पादनासाठी शेतीमधील विविध टाकाऊ मालापासून सेकंड जनरेशन इथेनॉलची निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी स्थानिक रिसोड नाक्याजवळ आयोजित वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचे कोनशिला अनावरणप्रसंगी केले. निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकर्‍यांसमोर नानाविध संकटे उभी राहत आहेत. शेतकर्‍यांनी आता शेती व बाजारपेठेचा अभ्यास करून अधिकाधिक उत्पादन देणार्‍या शेतमालाकडे वळले पाहिजे. शेतातील तुराट्या, पर्‍हाट्या, ऊसाचे चिपाड, आदी टाकाऊ मालापासून सेकंड जनरेशन इथेनॉलची निर्मिती होते. सध्या पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉलचा वापर केला जातो. यापुढे १0 टक्के वापर करण्याचे प्रस्तावित केले जाणार आहे. त्यामुळे इथेनॉलची मागणी वाढेल. इथेनॉलचा वापर करून नागपुरात १00 एअर कंडिशनर बसेस धावत आहेत. या सेकंड जनरेशन इथेनॉलपासून ह्यबायो-प्लास्टिकह्णची निर्मिती केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योग निर्मिती करून रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे ना. गडकरी म्हणाले. शेतकर्‍यांनी इथेनॉलची शेती करावी, असा सल्लाही गडकरी यांनी दिला. सर्व महामार्गांवर प्रत्येक ५0 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप, हॉटेलसह तेथील स्थानिक शेतीमालाची विक्री केंद्र उभारून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक १00 किलोमीटर अंतरावर ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जात असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी ना. गडकरी यांनी वाशिम जिल्ह्याला खूप काही भरभरून दिल्याचे सांगितले. वाशिम जिल्ह्यातील सिंचन अनुशेष, पुणे-मुंबईप्रमाणे मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग यासह अन्य प्रश्नही मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव, राजीव सातव, आमदार लखन मलिक, तानाजी मुटकुळे यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजय जाधव, पुरूषोत्तम राजगुरू, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्यासह भाजपा-सेना पदाधिकारी व जनसमुदायाची उपस्थिती होती.