शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:01 IST

तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम; राज्य शासनाने शेतकºयांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रूपयांपर्यतची कर्जमाफी दिली, तर नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदानही देण़्याची घोषणा केली; परंतू, तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे नि़यमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रतिक्षा आहे.महाविकास आघाडी शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुले पीककर्जमुक्ती योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांना २ लाखांपर्यंतच्या लाभाची रक्कम अदा करण्यासह नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांनी २०१७ ते २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास त्या शेतकºयांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पीककर्जाच्या रकमेवर जास्तीतजास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याची घोषणा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आली होती; परंतु अद्याप या घोषणेची अमलबजावणी सुरू झालेली नाही आणि प्रशासनाला पात्र ठरणाºया शेतकºयांची यादी तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.------------------.दोन लाखांवरील कर्जदार शेतकºयांनाही दिलासा नाहीमहाविकास आघाडी सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफी तसेच ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान अशा दोन योजनांसह तिसरी योजनाही जाहीर केली होती. त्यात २ लाखांवर कर्ज थकबाकी असलेल्यांनाही २ लाखांपर्यंत माफी देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी २ लाखांवर कर्ज थकित असलेल्या शेतकºयांना थकबाकी रक्कम आधी कर्जखात्यात भरावी लागणार होती. अद्याप या योजनेचा शासन आदेशही प्रतीक्षेत आहे.   नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत, तसेच २ लाखांवरील थकीत कर्जदार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबतचा आदेश किंवा शासन निर्णय अद्याप झालेला नाही. असा शासन निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील पात्र लाभार्थींची यादी तयार करून अमलबजावणी करण्यात येईल.-रवि गडेकर,जिल्हा उपनिबंधक, वाशिम  राज्यशासनाने नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची, तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांनाही २ लार्खांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणाही केली होती. शासनाने घोषणेनुसार अमलबजावणी तातडीने करावी, अशी ंअपेक्षा आहे.- नितिन पाटील उपाध्ये,शेतकरी, तथा ग्रा.पं. सदस्यकाजळेश्वर ता. कारंजा. जि. वाशिम

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी