शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:01 IST

तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम; राज्य शासनाने शेतकºयांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रूपयांपर्यतची कर्जमाफी दिली, तर नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदानही देण़्याची घोषणा केली; परंतू, तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे नि़यमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रतिक्षा आहे.महाविकास आघाडी शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुले पीककर्जमुक्ती योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांना २ लाखांपर्यंतच्या लाभाची रक्कम अदा करण्यासह नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांनी २०१७ ते २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास त्या शेतकºयांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पीककर्जाच्या रकमेवर जास्तीतजास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याची घोषणा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आली होती; परंतु अद्याप या घोषणेची अमलबजावणी सुरू झालेली नाही आणि प्रशासनाला पात्र ठरणाºया शेतकºयांची यादी तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.------------------.दोन लाखांवरील कर्जदार शेतकºयांनाही दिलासा नाहीमहाविकास आघाडी सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफी तसेच ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान अशा दोन योजनांसह तिसरी योजनाही जाहीर केली होती. त्यात २ लाखांवर कर्ज थकबाकी असलेल्यांनाही २ लाखांपर्यंत माफी देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी २ लाखांवर कर्ज थकित असलेल्या शेतकºयांना थकबाकी रक्कम आधी कर्जखात्यात भरावी लागणार होती. अद्याप या योजनेचा शासन आदेशही प्रतीक्षेत आहे.   नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत, तसेच २ लाखांवरील थकीत कर्जदार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबतचा आदेश किंवा शासन निर्णय अद्याप झालेला नाही. असा शासन निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील पात्र लाभार्थींची यादी तयार करून अमलबजावणी करण्यात येईल.-रवि गडेकर,जिल्हा उपनिबंधक, वाशिम  राज्यशासनाने नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची, तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांनाही २ लार्खांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणाही केली होती. शासनाने घोषणेनुसार अमलबजावणी तातडीने करावी, अशी ंअपेक्षा आहे.- नितिन पाटील उपाध्ये,शेतकरी, तथा ग्रा.पं. सदस्यकाजळेश्वर ता. कारंजा. जि. वाशिम

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी