शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:01 IST

तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम; राज्य शासनाने शेतकºयांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रूपयांपर्यतची कर्जमाफी दिली, तर नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदानही देण़्याची घोषणा केली; परंतू, तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही. त्यामुळे नि़यमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रतिक्षा आहे.महाविकास आघाडी शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुले पीककर्जमुक्ती योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांना २ लाखांपर्यंतच्या लाभाची रक्कम अदा करण्यासह नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. ज्या शेतकºयांनी २०१७ ते २०१९ या कालावधित कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास त्या शेतकºयांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पीककर्जाच्या रकमेवर जास्तीतजास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याची घोषणा यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आली होती; परंतु अद्याप या घोषणेची अमलबजावणी सुरू झालेली नाही आणि प्रशासनाला पात्र ठरणाºया शेतकºयांची यादी तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.------------------.दोन लाखांवरील कर्जदार शेतकºयांनाही दिलासा नाहीमहाविकास आघाडी सरकारने २ लाखांपर्यंत कर्जमाफी तसेच ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान अशा दोन योजनांसह तिसरी योजनाही जाहीर केली होती. त्यात २ लाखांवर कर्ज थकबाकी असलेल्यांनाही २ लाखांपर्यंत माफी देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी २ लाखांवर कर्ज थकित असलेल्या शेतकºयांना थकबाकी रक्कम आधी कर्जखात्यात भरावी लागणार होती. अद्याप या योजनेचा शासन आदेशही प्रतीक्षेत आहे.   नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत, तसेच २ लाखांवरील थकीत कर्जदार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याबाबतचा आदेश किंवा शासन निर्णय अद्याप झालेला नाही. असा शासन निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील पात्र लाभार्थींची यादी तयार करून अमलबजावणी करण्यात येईल.-रवि गडेकर,जिल्हा उपनिबंधक, वाशिम  राज्यशासनाने नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची, तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांनाही २ लार्खांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणाही केली होती. शासनाने घोषणेनुसार अमलबजावणी तातडीने करावी, अशी ंअपेक्षा आहे.- नितिन पाटील उपाध्ये,शेतकरी, तथा ग्रा.पं. सदस्यकाजळेश्वर ता. कारंजा. जि. वाशिम

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी