शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना आता सक्ती नाही - आमदार राजेंद्र पाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:57 IST

सौर कृषी पंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला असल्याची माहिती कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी े दिलीे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड  :  शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने सौर कृषी पंप योजना अंमलात आणली. ज्या  शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांना सौर कृषी पंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला असल्याची माहिती कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी े दिलीे.  शेतकºयांचा अल्पप्रतिसाद पाहता कृषी पंपाकरिता देण्यात येणारी वीज जोडणी हा विषय ऐच्छिक करण्यात यावी अशी मागणी आ.पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याकडे केली होती.  शाश्वत शेती, समृद्ध  शेतकरी आणि हरित उर्जेसाठी शासनस्तरावरून सौर कृषीपंप योजना अंमलात आली. अपारंपरिक उर्जास्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने  शेतकºयांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी. असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाºया  शेतकºयांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जाते. त्याकरिता शासनाकडून ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन  असणाºया  शेतकºयांना ८५ टक्के अनुदान दिले जाते, असे असतांना देखील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी शेतकरी उदासीन दिसत होते. तर दुसरीकडे ज्या  शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांच्याकडे सौरकृषी पंपाकरिता  लागणारे अतिरिक्त पैसे नसुन त्यांचा विद्युत पोलकडे असलेला कल पहाता हा विषय शेतकºयांसाठी सक्ती ऐवजी ऐच्छिक असावा असे मत आ.पाटणी यांनी व्यक्त केले. शेतकºयांची सौर कृषी पंपाकरिता असलेली नाराजी तसेच वाढत्या तक्रारी पहाता आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याशी चर्चा करून सौर कृषीपंपा हा विषय शेतकºयांना सक्ती ऐवजी ऐच्छिक करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी