शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

शेतमालाच्या किमतीबाबत शेतक-यांत नाराजी

By admin | Updated: June 17, 2015 02:07 IST

शेती व्यवस्थापनापासून शेतकरी अनभिज्ञ ;एमआरपीपेक्षा खत व बियाण्यांचे जादा दर.

वाशिम : कमी पाऊस, अतवृष्टी, रोगराई, वन्यप्राण्यांचा हैदोस या सर्व कठीण परिस्थितीतून घरात आलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याची खंत ८७ टक्के शेतकर्‍यांनी ह्यलोकमतह्णच्या सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केली. पीकपेरणीचा हंगाम लक्षात घेऊन ह्यलोकमतह्णतर्फे १६ जून रोजी ठराविक प्रश्नांवर शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. या बदलामध्ये अनेक शेतकरी सहभागी होऊन अधिकाधिक उत्पादन घेत आहेत तर दुसरीकडे बरेच शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. शेती व्यवस्थापनानुसार शेती करता काय? या प्रश्नावर ३६ टक्के शेतकर्‍यांनी होय असे उत्तर दिले तर ६४ टक्के शेतकर्‍यांनी नाही असे मत नोंदविले. शेतीत सिंचनाची सुविधा आहे काय? या प्रश्नावर ३९ टक्के शेतकर्‍यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे असे मत नोंदविले तर ६१ टक्के शेतकर्‍यांनी सिंचनाची सुविधा नसल्याचे मत नोंदविले. सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ६१ टक्के शेतकर्‍यांनी सांगितले. कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शासनाने पाच टप्प्यात पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यात अद्याप पीककर्ज पुनर्गठण सुरू झाले नसले तरी याबाबत ३५ टक्के शेतकरी आशावादी आहेत तर ६५ टक्के शेतकर्‍यांनी पीककर्ज पुनर्गठणाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. पेरणीच्या वेळी पीककर्ज पुनर्गठण होणे आवश्यक असल्याचे या शेतकर्‍यांनी सांगितले. एमआरपीनुसार खते व बियाण्यांच्या किंमती आकारल्या जात नसल्याचे ४३ टक्के शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ५७टक्के शेतकरी म्हणतात की एमआरपीनुसार किंमती आकारल्या जातात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीककर्ज विलंबाबाबत ५४ टक्के शेतकरी नाराज असल्याचे दिसून आले. पीककर्ज वेळेवरच मिळायला हवे असे मत या शेतकर्‍यांनी नोंदविले आहे. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई समाधानकारक नाही, असे ८८ टक्के शेतकर्‍यांना वाटते.