शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या किमतीबाबत शेतक-यांत नाराजी

By admin | Updated: June 17, 2015 02:07 IST

शेती व्यवस्थापनापासून शेतकरी अनभिज्ञ ;एमआरपीपेक्षा खत व बियाण्यांचे जादा दर.

वाशिम : कमी पाऊस, अतवृष्टी, रोगराई, वन्यप्राण्यांचा हैदोस या सर्व कठीण परिस्थितीतून घरात आलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याची खंत ८७ टक्के शेतकर्‍यांनी ह्यलोकमतह्णच्या सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केली. पीकपेरणीचा हंगाम लक्षात घेऊन ह्यलोकमतह्णतर्फे १६ जून रोजी ठराविक प्रश्नांवर शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शेतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. या बदलामध्ये अनेक शेतकरी सहभागी होऊन अधिकाधिक उत्पादन घेत आहेत तर दुसरीकडे बरेच शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. शेती व्यवस्थापनानुसार शेती करता काय? या प्रश्नावर ३६ टक्के शेतकर्‍यांनी होय असे उत्तर दिले तर ६४ टक्के शेतकर्‍यांनी नाही असे मत नोंदविले. शेतीत सिंचनाची सुविधा आहे काय? या प्रश्नावर ३९ टक्के शेतकर्‍यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे असे मत नोंदविले तर ६१ टक्के शेतकर्‍यांनी सिंचनाची सुविधा नसल्याचे मत नोंदविले. सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ६१ टक्के शेतकर्‍यांनी सांगितले. कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शासनाने पाच टप्प्यात पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यात अद्याप पीककर्ज पुनर्गठण सुरू झाले नसले तरी याबाबत ३५ टक्के शेतकरी आशावादी आहेत तर ६५ टक्के शेतकर्‍यांनी पीककर्ज पुनर्गठणाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. पेरणीच्या वेळी पीककर्ज पुनर्गठण होणे आवश्यक असल्याचे या शेतकर्‍यांनी सांगितले. एमआरपीनुसार खते व बियाण्यांच्या किंमती आकारल्या जात नसल्याचे ४३ टक्के शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ५७टक्के शेतकरी म्हणतात की एमआरपीनुसार किंमती आकारल्या जातात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीककर्ज विलंबाबाबत ५४ टक्के शेतकरी नाराज असल्याचे दिसून आले. पीककर्ज वेळेवरच मिळायला हवे असे मत या शेतकर्‍यांनी नोंदविले आहे. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई समाधानकारक नाही, असे ८८ टक्के शेतकर्‍यांना वाटते.