शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २९ कुटुंबांना मिळाला शेतकरी अपघात विमा योजनेचा मदतीचा हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:13 IST

अपघात होऊन शेतक-याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे

ठळक मुद्देप्रत्येकी २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पुरात वाहून जाणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊन शेतकºयाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात या योजनेतून १ डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.घरातील कर्त्या पुरूषाचा अपघात झाल्यास उत्पन्नाचे साधन बंद होऊन कुटूंबात अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकºयास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकºयांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांना दोन लक्ष रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळाले आहे. अपघात होणाºया शेतकºयांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येणार आहे. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ वर्षे वयोगटातील व सातबाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते, तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी