शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वाशिम जिल्ह्यातील २९ कुटुंबांना मिळाला शेतकरी अपघात विमा योजनेचा मदतीचा हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:13 IST

अपघात होऊन शेतक-याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे

ठळक मुद्देप्रत्येकी २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पुरात वाहून जाणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊन शेतकºयाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात या योजनेतून १ डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.घरातील कर्त्या पुरूषाचा अपघात झाल्यास उत्पन्नाचे साधन बंद होऊन कुटूंबात अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकºयास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकºयांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांना दोन लक्ष रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळाले आहे. अपघात होणाºया शेतकºयांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येणार आहे. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ वर्षे वयोगटातील व सातबाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते, तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी