शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

वाशिम जिल्ह्यातील २९ कुटुंबांना मिळाला शेतकरी अपघात विमा योजनेचा मदतीचा हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:13 IST

अपघात होऊन शेतक-याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे

ठळक मुद्देप्रत्येकी २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पुरात वाहून जाणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊन शेतकºयाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात या योजनेतून १ डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.घरातील कर्त्या पुरूषाचा अपघात झाल्यास उत्पन्नाचे साधन बंद होऊन कुटूंबात अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकºयास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकºयांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांना दोन लक्ष रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळाले आहे. अपघात होणाºया शेतकºयांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येणार आहे. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ वर्षे वयोगटातील व सातबाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते, तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी