शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

धान्य वितरणास नकार देणारे रास्त भाव दुकानदार कारवाईच्या ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:29 IST

स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, अशी माहिती येथील जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे पूर्णत: निवारण होईपर्यंत विमा संरक्षण देण्याच्या मुख्य मागणीसाठी रास्त भाव दुकानदार धान्य उचलणार नाहीत आणि वाटपही करणार नाहीत, असा निर्धार करण्यात आला; मात्र ही चुकीची बाब असून अशा संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, अशी माहिती येथील जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.राश्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ चे कलम ३(१) मधील तरतूदीनुसार सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेणे हा संबंधित लाभार्थ्यांचा हक्क आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित ठेवल्यास कलम २३(१) अन्वये शास्तीची तरतूद आहे. त्यानुषंगाने माहे जून २०२० चे धान्य प्रत्येक रास्त भाव दुकानदास वितरित केले जाईल, असे नियोजन करण्यात यावे. शासकीय गोदामात साठविलेल्या धान्याचे वाटप करण्याबाबत आणि कुठलाच लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्यात यावी. आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशनने घेतलेल्या निर्णयानुसार रास्त भाव दुकानदारांनी १ जून २०२० पासून धान्याची उचल न केल्यास किंवा दुकाने बंद ठेवल्यास तो जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मधील तरतूदींचा भंग केल्याचे गृहीत धरून कलम ३ व ७ अन्वये संबंधित रास्त भाव दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शासनाने दिला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी जाधव यांनी सांगितले. याऊपरही जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार कुठली भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :washimवाशिम