शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

लोकसहभागातून २.४९ कोटी लीटर पाणी साठवण्याची सोय                    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 14:32 IST

जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क                           वाशिम : गावाच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या हद्दपार करण्याचा जणू वाशिम जिल्ह्यातील साखरावासियांनी विडाच उचलला आहे. जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे. यामुळे तब्बल २.४९ कोटी लिटर पाण्याची साठवणूक होणार आहे. शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून ही किमया साधली आहे.आदर्श गाव साखरा येथील जलमित्र तथा ग्रामकार्यकर्ते सुखदेव आत्माराम इंगळे यांनी जलमित्र या नात्याने गावात जलजागृती व जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचे फलित झाले आणि गावातील बुजत चाललेल्या तलावाचे पुनरुज्जीवन झाले. १० जेसीबी मशीनच्या आधारे या तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला आणि हा गाळ शेतकºयांनी आपल्या शेतात टाकून आपली हलकी जमीन सुपिक बनवली आहे. शेतकरी, ग्रामस्थांच्या श्रमदानासह लोकवर्गणीतून या तलावाचे खोलीकरण करण्यात आल्यानंतर तलावाची लांबी २६० मीटर, रुंदी १२० मीटर आणि खोली ८० मीटर झाली आहे. त्यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता २ कोटी ४९ लाख ६० हजार लीटर झाली आहे.  यामुळे गावातील भुजल पातळीतही वाढ होणार असुन, त्याचा फायदा शेती सिंचनासह गुरा ढोरांना होईल आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही.  ८८२० ब्रास गाळ उपसासाखरा येथे लोक सहभागातून करण्यात आलेले तलाव खोलीकरण जिल्हाभरातील लोकांसाठी आदर्श ठरावे, असेच आहे. या तलावासाठी अवघ्या ७ जेसीबी मशीनच्या आधारे १० दिवसांत तब्बल ८८२० ब्रास खोदकाम करून गाळाचा उपसा करण्यात आला. तर १९ शेतकºयांनी तब्बल ८६९० ट्रॉली गाळ नेऊन आपल्या शेतात टाकला आहे. त्यात गजानन राऊत आणि महादेव राऊत यांनी प्रत्येकी २००० ट्रॉली, भास्कर महाले यांनी ७०२ ट्रॉली, गजानन इंगळे यांनी ५५० ट्रॉली, राजाराम वैद्य यांनी ५०२, विजय अघम यांनी ३९०, मधुकर शिंदें यांनी ३६०, रामराव इंगळे, लक्ष्मण राऊत, भास्कर ठाकरे, सखाराम राऊत यांनी प्रत्येकी ३५०, मारोती इंगळे, रामचंद्र इंगळे यांनी प्रत्येकी १६०, महादेव महाले १५५, पंढरी महाले १५०, तर बंडू धतुडे, शिवाजी शिंदे, श्रीराम महाले यांनी प्रत्येकी १०० ट्रॉली गाळ शेतात नेऊन टाकला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी