शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भीषण पाणीटंचाई : जनावरांना लागणारे पाणीही घ्यावे लागतेय विकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:22 IST

वाशिम : शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखणारा जाणारा दुग्धव्यवसाय सद्या पुरता अडचणीत सापडला असून दुष्काळसदृष स्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे जनावरे पोसणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आजमितीस ३ लाखांपेक्षा अधिक पशूधन असल्याची नोंद जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडे आहे. जिल्ह्यातील १३० पैकी १०० च्या वर सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण पडले. पशूपालकांनी आपल्या जनावरांसाठी लागणारे पिण्याचे पाणी चक्क विकत घेणे सुरू केले आहे.

वाशिम : शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखणारा जाणारा दुग्धव्यवसाय सद्या पुरता अडचणीत सापडला असून दुष्काळसदृष स्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे जनावरे पोसणे कठीण झाले आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे ग्रामीण भागातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने दुधाळ जनावरांना पिण्याकरिता तथा त्यांच्या अंगावर घालण्याकरिता लागणारे पाणी पशुपालकांना चक्क विकत घ्यावे लागत आहे. होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने दैनंदिन नुकसान होत असल्याचा सूर पशुपालकांमधून उमटत आहे.जिल्ह्यात आजमितीस ३ लाखांपेक्षा अधिक पशूधन असल्याची नोंद जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडे आहे. त्यापैकी दुधाळ गायी व म्हशींची संख्या १ लाख २८ हजार आहे. याआधारे जेमतेम शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाची कास धरून आपला उदरनिर्वाह चालविला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सातत्याने झालेली घट आणि विविध  स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे शेतीसोबतच दुग्धव्यवसाय देखील धोक्यात सापडला आहे. यंदा तर जिल्ह्यातील १३० पैकी १०० च्या वर सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण पडले असून विहिरी, हातपंप, कुपनलिकांची पाणीपातळीही खोलवर गेल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, केवळ दुग्धव्यवसायावरच उपजिविका अवलंबून असलेल्या काही पशूपालकांनी आपल्या जनावरांसाठी लागणारे पिण्याचे पाणी चक्क विकत घेणे सुरू केले आहे. ही स्थिती आगामी काही दिवसांमध्ये अधिकच गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुधाळ जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. याशिवाय त्यांच्या अंगावरही पाणी घालावे लागते; अन्यथा त्यांच्यापासून मिळणाºया दुधावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक पशूपालकांना खासगीत पाण्याचे टँकर विकत घेवून ही गरज भागवावी लागत आहे.- डॉ. भागवत महाले, पशूधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना, तांदळी-शेवई

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी